शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

रस्ता दुरुस्त करा, आमचा जीव वाचवा! जिंतूर-येलदरी रस्ता दुरुस्तीसाठी लक्षवेधी तिरडी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:43 IST

रस्त्याच्या खस्ताहाल अवस्थेविरोधात नागरिकांचा अनोखा एल्गार

येलदरी वसाहत (जि. परभणी) : जिंतूर–येलदरी मुख्य रस्त्याच्या दयनीय स्थितीविरोधात संतप्त नागरिकांनी २८ मे रोजी तिरडी यात्रा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला. हे आंदोलन अनोख्या पद्धतीने करण्यात आले असून, यात तृतीयपंथीयांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

हा रस्ता केवळ जिंतूर तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा मार्ग नाही, तर तो मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की “रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अपघाताचा धोका वाढत असून, पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शाळकरी मुले, रुग्ण, शेतकरी आणि वाहनधारक यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ "रस्ता दुरुस्त करा आमचा जीव वाचवा" असे फलक घेऊन नागरिकांनी तिरडी यात्रा काढली. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा प्रतिकात्मक उपाय योजण्यात आला.

याआधीही खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन झाले होते आणि त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात काही कामे करण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात मुरुम वाहून गेल्याने पुन्हा मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला आहे.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, रिपब्लिकन सेना यांसारख्या संघटनांचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. नागरिकांनी इशारा दिला आहे की प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास पुढील टप्प्यात तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन