शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला; साथीच्या रोगांनी काढले डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:22 IST

दरवर्षी पावसाळ्यामध्ये साथ रोगांचा फैलाव वाढतो. जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने डासांपासून पसरणारे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि ...

दरवर्षी पावसाळ्यामध्ये साथ रोगांचा फैलाव वाढतो. जागोजागी पाण्याचे डबके साचल्याने डासांपासून पसरणारे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि हवेतून पसरणाऱ्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो. सध्या जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डेंग्यू, चिकनगुन्या, घोडागौर हे आजार जिल्ह्यात पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांनी या साथ रोगापासून बचाव करण्यासाठी परिसर स्वच्छता करावी. डासांची उत्पत्ती होणार नाही, या दृष्टीने घरगुती उपाय केल्यास साथ रोगापासून बचाव होऊ शकतो.

ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस

यावर्षीच्या पावसाळ्यात जून आणि जुलै या दोन महिन्यांत भरपूर पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने ताण दिला आहे. या महिन्यात २३ तारखेपर्यंत १८० मिमी पाऊस होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १०८ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे केवळ ६० टक्के पावसाची नोंद झाली.

वातावरण बदलले; काळजी घ्या...

वातावरणातील बदल विषाणूंसाठी नेहमीच पोषक असतो. त्यामुळेच ऋतू पालट होताना साथीचे आजार पसरतात.

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढतात. पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, काविळ या आजारांचा फैलाव होतो. डबक्यातून होणाऱ्या डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, चिकनगुन्या, संसर्गजन्य ताप या साथी पसरतात.

दरवर्षीच साथ रोग उद्भवतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.