शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
3
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
4
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
5
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
6
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
7
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
8
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
9
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
10
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
11
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
12
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
13
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
14
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
15
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
17
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
18
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
19
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
20
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
Daily Top 2Weekly Top 5

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या ...

जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या पिकांना अधिक फटका बसला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या फटक्यातून वाचलेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खिंडीत गाठल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाभरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने करावेत. यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करावी. पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे नोटकॅमद्वारे फोटो घेऊन पेरणी क्षेत्राशी बाधित झालेल्या पंचनाम्याचे क्षेत्र तपासून घ्यावे. एकूण झालेल्या क्षेत्राची ऐच्छिक पद्धतीने उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५ टक्के तर तहसीलदारांनी १० टक्के तपासणी करावी. याशिवाय विभागीय आयुक्तांच्या पथकाकडूनही एकूण पंचनामा क्षेत्राच्या १ टक्का तपासणी ऐच्छिक पद्धतीने होणार आहे. पंचनामे करताना बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जुलैमधील नुकसानीची वेगळी नोंद

जिल्ह्यात काही भागात जुलै महिन्यातही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ६६ हजार १२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडे ४५ कोटी २१ लाख रुपयांच्या मदतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे करताना जुलैमध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची द्विरुक्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तीन विभागांचा संयुक्त अहवाल

झालेल्या पंचनाम्याचा महसूल, कृषी व पंचायत विभागातील अधिकाऱ्यांकडून संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या संदर्भात विलंब होता कामा नये, असे आदेशात नमूद केले आहे.

सव्वा लाखपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज

जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ सप्टेंबर रोजी सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल आल्यानंतर खरी आकडेवारी समोर येणार आहे.