शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
3
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
4
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
5
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
6
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
7
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
8
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
9
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
10
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
11
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
12
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
13
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
14
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
16
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
17
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
18
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
19
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
20
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
Daily Top 2Weekly Top 5

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST

जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या ...

जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या पिकांना अधिक फटका बसला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील अतिवृष्टीच्या फटक्यातून वाचलेल्या शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील अतिवृष्टीने खिंडीत गाठल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाच्या वतीने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हाभरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत. हे पंचनामे वस्तुनिष्ठ पद्धतीने करावेत. यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी साहाय्यक यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करावी. पंचनामे करताना झालेल्या नुकसानीचे नोटकॅमद्वारे फोटो घेऊन पेरणी क्षेत्राशी बाधित झालेल्या पंचनाम्याचे क्षेत्र तपासून घ्यावे. एकूण झालेल्या क्षेत्राची ऐच्छिक पद्धतीने उपविभागीय अधिकाऱ्यांनी ५ टक्के तर तहसीलदारांनी १० टक्के तपासणी करावी. याशिवाय विभागीय आयुक्तांच्या पथकाकडूनही एकूण पंचनामा क्षेत्राच्या १ टक्का तपासणी ऐच्छिक पद्धतीने होणार आहे. पंचनामे करताना बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जुलैमधील नुकसानीची वेगळी नोंद

जिल्ह्यात काही भागात जुलै महिन्यातही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ६६ हजार १२७ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याने राज्य शासनाकडे ४५ कोटी २१ लाख रुपयांच्या मदतीची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे करताना जुलैमध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची द्विरुक्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

तीन विभागांचा संयुक्त अहवाल

झालेल्या पंचनाम्याचा महसूल, कृषी व पंचायत विभागातील अधिकाऱ्यांकडून संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. या संदर्भात विलंब होता कामा नये, असे आदेशात नमूद केले आहे.

सव्वा लाखपेक्षा अधिक नुकसानीचा अंदाज

जिल्ह्यात महसूल व कृषी विभागाच्या अंदाजानुसार ६ व ७ सप्टेंबर रोजी सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा अहवाल आल्यानंतर खरी आकडेवारी समोर येणार आहे.