शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांची तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST

परभणी : हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या परभणी शहरातील पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० ...

परभणी : हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या परभणी शहरातील पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५० लाख रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी भारतीय बंजारा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

येथील वसमत रोडवरील वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात पुतळ्याच्या सुशोभीकरणासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. वसंतराव नाईक यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १० टक्के रक्कमसुद्धा खर्च झाली नाही. तेव्हा उर्वरित रक्कम परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास देऊन या निधीच्या माध्यमातून वसंतराव नाईक शेती संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे, वसंतराव नाईक महामंडळाला ५०० कोटी रुपये द्यावेत, दलित वस्तीप्रमाणे तांडा वस्तीलाही निधी द्यावा, भटक्या व विमुक्तांच्या आश्रमशाळा, वसतिगृहांना वाढीव अनुदान द्यावे, मूळ भटक्या व विमुक्त यांना १३ जातींचा समावेश असताना ४ टक्के आरक्षण होते. सध्या ९३ जातींचा समावेश झाला आहे. तेव्हा लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवून द्यावे, ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृह सुरू करावे, भटक्या विमुक्तांसाठी जिल्हा स्तरावर वसंतराव नाईक पुरस्कार देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाला निवेदन देताना देवीदास राठोड, गोपीनाथ राठोड, शिवराम जाधव, कैलास चव्हाण, राजेश जाधव, लक्ष्मण जाधव, अशोक जाधव, कसळसिंग चव्हाण, प्रल्हाद चव्हाण, विशाल राठोड, लक्ष्मीकांत राठोड, नामदेव राठोड, केसर जाधव, प्रकाश चव्हाण, अशोक आवडे, मोहन राठोड, गणपत राठोड, मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.