शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

नवीन ८ तलाठी सज्जांची निर्मिती कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची ...

मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची निर्मिती करुन अडीच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. नवीन पदे मंजूर करण्यात न आल्याने अजूनही जुन्याच तलाठी कार्यालयातून कारभार चालविला जात असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून अडीच वर्षांपूर्वी मानवत तालुक्यातील तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत नव्याने ८ सज्जा बरोबरच २ मंडळांची निर्मिती करण्यात आली. परिणामी सज्जांची संख्या २१ वरुन २९ वर गेली. तर महसूल मंडळाची संख्या ३ होती. नवीन पुनर्रचनेत ही संख्या ५ वर गेली आहे. पूर्वी एकाच तलाठी सज्जावर बहुसंख्य गावांचा ताण पडत असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. शिवाय तलाठी सज्जांना जोडण्यात आलेल्या गावाचे अंतरही दूर असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींसह आर्थिक फटकाही बसत होता. शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने १ जानेवारी २०१८ ला तालुक्यातील सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या मध्ये सोमठाणा, टाकळी नि, देवलगाव अवचार, पिंपळा, किन्होळा, कुंभारी, पोहंडुळ, हाटकरवाडी, या ८ नवीन तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. नवीन सज्जामुळे अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी शासनाकडून नवीन तलाठी सज्जा व २ नवीन महसूल मंडळासाठी आवश्यक असणारी पदेच मंजूर करण्यात आली नसल्याने तलाठी सज्जे कागदावरच राहिले आहेत.

मानवत शहरातून सज्जांचा कारभार

जे तलाठी तहसील कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. ते अपडाउन करीत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत मानवत, रत्नापूर, मानोली, उक्कलगाव, पाळोदी, सावळी, रुढी, नागरजवळा, कोल्हा, कोथाळा, इरळद, करंजी, ताडबोरगाव, सावरगाव, केकरजवळा, वझुर बु, सारंगापूर, रामेटाकळी, रामपुरी बु, मंगरुळ बु, भोसा असे एकूण २१ सज्जे आहेत. यापैकी बहुतांश तलाठ्यांनी ऑनलाईन कामे करण्यासाठी सज्जाच्या ठिकाणी नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याचे कारण दाखवून शहरात सज्जे थाटले आहेत. ५३ गावे या सज्जाला जोडलेली असून हजारो ग्रामस्थांना दाखले किंवा प्रमाणपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.