शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

नवीन ८ तलाठी सज्जांची निर्मिती कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची ...

मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची निर्मिती करुन अडीच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. नवीन पदे मंजूर करण्यात न आल्याने अजूनही जुन्याच तलाठी कार्यालयातून कारभार चालविला जात असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून अडीच वर्षांपूर्वी मानवत तालुक्यातील तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत नव्याने ८ सज्जा बरोबरच २ मंडळांची निर्मिती करण्यात आली. परिणामी सज्जांची संख्या २१ वरुन २९ वर गेली. तर महसूल मंडळाची संख्या ३ होती. नवीन पुनर्रचनेत ही संख्या ५ वर गेली आहे. पूर्वी एकाच तलाठी सज्जावर बहुसंख्य गावांचा ताण पडत असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. शिवाय तलाठी सज्जांना जोडण्यात आलेल्या गावाचे अंतरही दूर असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींसह आर्थिक फटकाही बसत होता. शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने १ जानेवारी २०१८ ला तालुक्यातील सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या मध्ये सोमठाणा, टाकळी नि, देवलगाव अवचार, पिंपळा, किन्होळा, कुंभारी, पोहंडुळ, हाटकरवाडी, या ८ नवीन तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. नवीन सज्जामुळे अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी शासनाकडून नवीन तलाठी सज्जा व २ नवीन महसूल मंडळासाठी आवश्यक असणारी पदेच मंजूर करण्यात आली नसल्याने तलाठी सज्जे कागदावरच राहिले आहेत.

मानवत शहरातून सज्जांचा कारभार

जे तलाठी तहसील कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. ते अपडाउन करीत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत मानवत, रत्नापूर, मानोली, उक्कलगाव, पाळोदी, सावळी, रुढी, नागरजवळा, कोल्हा, कोथाळा, इरळद, करंजी, ताडबोरगाव, सावरगाव, केकरजवळा, वझुर बु, सारंगापूर, रामेटाकळी, रामपुरी बु, मंगरुळ बु, भोसा असे एकूण २१ सज्जे आहेत. यापैकी बहुतांश तलाठ्यांनी ऑनलाईन कामे करण्यासाठी सज्जाच्या ठिकाणी नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याचे कारण दाखवून शहरात सज्जे थाटले आहेत. ५३ गावे या सज्जाला जोडलेली असून हजारो ग्रामस्थांना दाखले किंवा प्रमाणपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.