शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ८ तलाठी सज्जांची निर्मिती कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची ...

मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची निर्मिती करुन अडीच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. नवीन पदे मंजूर करण्यात न आल्याने अजूनही जुन्याच तलाठी कार्यालयातून कारभार चालविला जात असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून अडीच वर्षांपूर्वी मानवत तालुक्यातील तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत नव्याने ८ सज्जा बरोबरच २ मंडळांची निर्मिती करण्यात आली. परिणामी सज्जांची संख्या २१ वरुन २९ वर गेली. तर महसूल मंडळाची संख्या ३ होती. नवीन पुनर्रचनेत ही संख्या ५ वर गेली आहे. पूर्वी एकाच तलाठी सज्जावर बहुसंख्य गावांचा ताण पडत असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. शिवाय तलाठी सज्जांना जोडण्यात आलेल्या गावाचे अंतरही दूर असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींसह आर्थिक फटकाही बसत होता. शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने १ जानेवारी २०१८ ला तालुक्यातील सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या मध्ये सोमठाणा, टाकळी नि, देवलगाव अवचार, पिंपळा, किन्होळा, कुंभारी, पोहंडुळ, हाटकरवाडी, या ८ नवीन तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. नवीन सज्जामुळे अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी शासनाकडून नवीन तलाठी सज्जा व २ नवीन महसूल मंडळासाठी आवश्यक असणारी पदेच मंजूर करण्यात आली नसल्याने तलाठी सज्जे कागदावरच राहिले आहेत.

मानवत शहरातून सज्जांचा कारभार

जे तलाठी तहसील कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. ते अपडाउन करीत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत मानवत, रत्नापूर, मानोली, उक्कलगाव, पाळोदी, सावळी, रुढी, नागरजवळा, कोल्हा, कोथाळा, इरळद, करंजी, ताडबोरगाव, सावरगाव, केकरजवळा, वझुर बु, सारंगापूर, रामेटाकळी, रामपुरी बु, मंगरुळ बु, भोसा असे एकूण २१ सज्जे आहेत. यापैकी बहुतांश तलाठ्यांनी ऑनलाईन कामे करण्यासाठी सज्जाच्या ठिकाणी नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याचे कारण दाखवून शहरात सज्जे थाटले आहेत. ५३ गावे या सज्जाला जोडलेली असून हजारो ग्रामस्थांना दाखले किंवा प्रमाणपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.