शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

परभणीत शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा; विमा कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:10 PM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स विमा कंपनीवर व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला.

नवा मोंढ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सकाळी ११ वाजताच तालुक्यातील शेतकरी मोर्चात सहभागी होण्यासाठी दाखल झाली. मार्केटयार्डात उपस्थित शेतकऱ्यांना कृउबा संचालक गणेश घाटगे, किर्तीकुमार बुरांडे, शिवाजी बेले यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गेे पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला. 

शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करून जिल्ह्यातील खरीप हंगामात पावसाचा ताण पडल्याने सोयाबीन पिकाचे जवळपास ७० टक्के नुकसान झाले होते. जिल्ह्यातील प्रशासनाने ३५ टक्के आणेवारी काढली असताना शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ४० हजार रुपये विम्याची जोखीम रक्कम मिळणे अपेक्षित होते़ परंतु, मुठभर शेतकऱ्यांनाच त्या विम्याचा लाभ देण्यात आला आहे़ उर्वरित शेतकऱ्यांना विमा योजनेतून वगळण्यात आले आहे़ त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या केल्या. या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना देण्यात आले़ 

मोर्चात भारत कच्छवे, अमोल चव्हाण, माणिकराव वाघ, तुकाराम गिराम, राजाराम गमे, माणिकराव शिंदे, राम धनकोंड, अमर रायमले, मोहन कच्छवे, त्र्यंबकराव बुचाले, हनुमान शिंदे, नरहरी शिंदे, भक्तराज लवंडे, अब्दुल भाई, गजानन बाबर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणी