शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : जि.प.त सिंचन विहिरींवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:01 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी विजय मुळीक, बांधकाम सभापती अशोक काकडे, सभापती राधाबाई सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती उर्मिला बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे आदींची उपस्थिती होती. यावेळी जि.प.सदस्य विष्णू मांडे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या विहिरींचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहराकडे स्थलांतर होत आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र नवीन सिंचन विहिरींना मंजुरी देत नाही. त्यामुळे जनतेची अडवणूक का केली जात आहे, असा सवाल केला. त्यावर या विभागाच्या अधिकाºयांनी जुन्या विहिरींची कामे पूर्ण झाली नसल्याने नवीन विहिरींना मंजुरी देता येत नसल्याचे सांगितले. त्यावर मांडे यांनी ३-३ महिने पंचायत समितीस्तरावर फाईली प्रलंबित ठेवल्या जातात. याला जबाबदार कोण आहे, शेतकºयांनी विहिरींची कामे पूर्ण करुनही त्यांना देयके दिली जात नाहीत. कामांचे अंतिमीकरण केले जात नाही. त्यामुळे अधिकाºयांकडूनच शेतकºयांची अडवणूक केली जाते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर जि.प. सदस्य डॉ.सुभाष कदम यांनी शासनाने प्रत्येक कामकाज किती दिवसांमध्ये पूर्ण केले पाहिजे, याचे नियम घालून दिले आहेत, तसा नागरिकांचा जाहीरनामा कार्यालयासमोर लावला आहे का, असा सवाल केला. जिल्हा परिषदेतच अनेक विभागांमध्ये असे बोर्डच नाहीत. त्यामुळे शासन गतीशिल असले तरी प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला.सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी४दुपारी १ वाजता सुरु होणारी सर्वसाधारण सभा अडीच तास उशिराने सुरु झाली. त्यातही काही सदस्य अधुन-मधून निघून जात होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे प्रमुख रत्नाकर गायकवाड हे गंगाखेड, पालम दौºयावर आल्याने सायंकाळी सीईओं बी.पी. पृथ्वीराज व अतिरिक्त सीईओं मुळीक हे निघून गेले. त्यामुळे नाराज जि.प.सदस्य समशेर वरपूडकर यांनी प्रमुख अधिकारीच उपस्थित नसतील तर उत्तरे कोण देणार, असा सवाल करुन ही सर्वसाधारण सभा तहकूब करा, अशी जि.प. अध्यक्षांकडे मागणी केली. यावेळी त्यांनी राजीनाम्याचाही इशारा दिला.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पzpजिल्हा परिषद