शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

परभणी : जि.प.त सिंचन विहिरींवरून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:01 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या सिंचन विहिरींची देयके काढण्यावरुन व नव्या सिंचन विहिरींना मंजुरी देण्यावरुन जिल्हा परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सर्वसाधारण सभेस सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी विजय मुळीक, बांधकाम सभापती अशोक काकडे, सभापती राधाबाई सूर्यवंशी, समाजकल्याण सभापती उर्मिला बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे आदींची उपस्थिती होती. यावेळी जि.प.सदस्य विष्णू मांडे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या विहिरींचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात एकीकडे दुष्काळ असल्याने लोकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहराकडे स्थलांतर होत आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र नवीन सिंचन विहिरींना मंजुरी देत नाही. त्यामुळे जनतेची अडवणूक का केली जात आहे, असा सवाल केला. त्यावर या विभागाच्या अधिकाºयांनी जुन्या विहिरींची कामे पूर्ण झाली नसल्याने नवीन विहिरींना मंजुरी देता येत नसल्याचे सांगितले. त्यावर मांडे यांनी ३-३ महिने पंचायत समितीस्तरावर फाईली प्रलंबित ठेवल्या जातात. याला जबाबदार कोण आहे, शेतकºयांनी विहिरींची कामे पूर्ण करुनही त्यांना देयके दिली जात नाहीत. कामांचे अंतिमीकरण केले जात नाही. त्यामुळे अधिकाºयांकडूनच शेतकºयांची अडवणूक केली जाते. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर जि.प. सदस्य डॉ.सुभाष कदम यांनी शासनाने प्रत्येक कामकाज किती दिवसांमध्ये पूर्ण केले पाहिजे, याचे नियम घालून दिले आहेत, तसा नागरिकांचा जाहीरनामा कार्यालयासमोर लावला आहे का, असा सवाल केला. जिल्हा परिषदेतच अनेक विभागांमध्ये असे बोर्डच नाहीत. त्यामुळे शासन गतीशिल असले तरी प्रशासन ढिम्म असल्याचा आरोप त्यांनी केला.सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी४दुपारी १ वाजता सुरु होणारी सर्वसाधारण सभा अडीच तास उशिराने सुरु झाली. त्यातही काही सदस्य अधुन-मधून निघून जात होते. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे प्रमुख रत्नाकर गायकवाड हे गंगाखेड, पालम दौºयावर आल्याने सायंकाळी सीईओं बी.पी. पृथ्वीराज व अतिरिक्त सीईओं मुळीक हे निघून गेले. त्यामुळे नाराज जि.प.सदस्य समशेर वरपूडकर यांनी प्रमुख अधिकारीच उपस्थित नसतील तर उत्तरे कोण देणार, असा सवाल करुन ही सर्वसाधारण सभा तहकूब करा, अशी जि.प. अध्यक्षांकडे मागणी केली. यावेळी त्यांनी राजीनाम्याचाही इशारा दिला.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पzpजिल्हा परिषद