शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

परभणी जिल्हा परिषद :विविध प्रश्नांवर गाजली सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:56 IST

पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार, शिक्षण विभागातील सावळा गोंधळ आणि जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी करावयाची निधीची तरतूद अशा विविध प्रश्नांवर बुधवारी पार पडलेली जि.प.ची सर्वसाधारण सभा गाजली़येथील जिल्हा परिषदेच्या बाबुराव पाटील गोरेगावकर सभागृहात जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली या सभेला सुरुवात झाली़ याप्रसंगी उपाध्यक्ष भावनाताई नखाते, सभापती उर्मिलाताई बनसोडे, श्रीनिवास मुंडे, अशोक काकडे, राधाबाई सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) एम़व्ही़ करडखेलकर यांची उपस्थिती होती़ प्रारंभी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन करण्यात आला़ या सभेत एकूण ७ विषय चर्चेसाठी ठेवले होते़ तसेच ऐनवेळच्या दोन विषयांवरही चर्चा झाली़ जिल्हा परिषदेच्या २०१८-१९ वर्षाच्या विकासाचा आराखडा तयार करून तो नियोजन समितीकडे सादर करण्याचा विषय चर्चेला आला़ विविध विभागांच्या कामांचा अंतर्भाव करून २५ कोटी २५ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ या प्रस्तावास मंजुरी देण्यासाठी हा ठराव समोर ठेवण्यात आला़ परंतु, या आराखड्यात समाविष्ट केलेल्या कामांची यादी जि़प़ सदस्यांना दिली नसल्याने सदस्यांनी या विषयावर आक्षेप नोंदविला़ सर्व गटांचा समान सहभाग करून ७०:३० च्या फार्मुल्याप्रमाणे निधीचे वितरण व्हावे, अशी मागणी सदस्यांनी केली़ त्यावर सदस्यांना कामांची यादी लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले़ त्यानंतर पुढील विषयावर चर्चा झाली़ जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, शिवसेनेचे गटनेते राम खराबे, विष्णू मांडे, समशेर वरपूडकर, भगवान सानप, राजेश फड, डॉ़ सुभाष कदम आदींनी या विषयावर चर्चा केली़शिक्षण विभागाच्या रिक्त पदांचा विषयही सभेमध्ये गाजला़ शिक्षण विभागाने आपल्या सोयीनुसार ‘कंपल्सरी व्हॅकंट’ पदे ठेवल्याचा आक्षेप सदस्यांनी घेतला़ ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तेथील पदे रिक्त ठेवणे अपेक्षित असताना विद्यार्थी संख्या अधिक असलेल्या शाळांमधील पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे़, असे डॉ़ सुभाष कदम, विष्णू मांडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भातील अहवाल लवकरच सादर करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत़ तसेच आरटीई कायद्यानुसार शाळांचे निकष ठरविलेले असतात़ परंतु, तपासी अधिकारी आरटीई इंडिकेटर तपासत नाहीत, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. अनेक शाळा आरटीई कायद्याचे निकष पूर्ण करीत नसताना त्यांचा अहवाल मात्र सकारात्मक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व शाळांची एक महिन्याच्या आत तपासणी करून आरटीई इंडिकेटरचा अहवाल सादर केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी सभागृहास सांगितले़दुपारी ३ वाजता सुरू झालेली ही सर्वसाधारण सभा सायंकाळी ६़३० वाजेपर्यंत सुरू होती़ या सभे दरम्यान, गटनेते श्रीनिवास जोगदंड, राम खराबे, अजय चौधरी यांच्यासह जि.प. सदस्य विष्णू मांडे, मीनाताई राऊत, अरुणाताई काळे, बाळासाहेब रेंगे, किशनराव भोसले आदींनी चर्चेत सहभाग नोंदविला़पाणीपुरवठा अभियंत्यांची होणार चौकशीजिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, डॉ़ सुभाष कदम, भगवान सानप यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसूकर यांची चौकशी करण्याची मागणी सभागृहासमोर केली़ अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना बंद आहेत़ आराखड्यानुसार कामे झाली नाहीत, असा तक्रारींचा सूर सदस्यांनी आळविला़ त्याचप्रमाणे जि़प़ सदस्य भगवान सानप यांनीही ग्रामीण भागात हातपंपांवर क्युरिफाईन पुरवठा करण्याच्या कंत्राटात गैरप्रकार झाल्याचे नमूद केले़ ९९ लाख रुपयांचे हे कंत्राट असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली़ यावर जि़प़ मुख्य कार्यकारी पृथ्वीराज यांनी वसूकर यांची चौकशी करण्यासाठी समितीची नियुक्ती केली जाईल, असे सभागृहासमोर सांगितले़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदWaterपाणीeducationशैक्षणिक