शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:13 IST

पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयामुळे गोदाकाठचा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे़ मात्र अनेक शेतकºयांच्या जमिनी बॅक वाटरखाली गेल्याने शेतकरी भूमिहिन झाले आहेत़ बॅक वॉटरखाली जाणाºया जमिनीचे मोजमाप करताना पथकाने अनेक शेतकºयांचे नुकसान केले आहे़ मावेजा वाटप सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़फरकंडा शिवारात सर्व्हे नं़ १४४ मध्ये १ हेक्टर ३१ आर जमीन आहे़ यापैकी जवळपास ८९ आर जमीन बॅक वॉटरखाली जात आहे़ या जमिनीचा मोबदला देताना केवळ ३२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे़ त्यामुळे चार शेतकºयांचे प्रत्येकी ८ आरच जमिनीचे पैसे मिळाले आहेत़ परिणामी इतर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे़वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ जायमोक्यावर येऊन पाहणी करून नव्याने सर्व्हेक्षण करावे व तातडीने लाभार्थी शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रसाद पौळ, भगवान पौळ, विठ्ठल पौळ, प्रल्हाद पौळ आदींनी विष्णू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे़दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावेजा वाटपाचे प्रकरण विष्णूपुरी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून रेंगाळत ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे जमिनी जाऊनही शेतकºयांना मावेजासाठी संघर्ष करावा लागत आहे़प्रकल्प यंत्रणेचे दुर्लक्ष : सूड उगावत असल्याची शेतकºयांची तक्रारडिग्रस बंधाºयाचे कामकाज पाहणारे कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे़ शेतकºयांवरील अन्याय दूर करावा, यासाठी वारंवार प्रकल्प कार्यालयाकडे लाभार्थी हेलपाटे मारत आहेत़ मात्र जाणीवपूर्वक शेतकºयांना दुर्लक्षित केले जात आहे़ पाणी सोडताना शेतकरी दरवर्षी विरोध करतात़ याचाच राग मनात धरून अधिकारी व कर्मचारी सूड उगावत असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत़शेतकरी राहिले वंचितपालम तालुक्यातील आरखेड शिवारात गोदावरी व गळाटी नदीच्या काठच्या जमिनी बॅक वॉटरखाली जात आहेत़ पथकाने जमिनीची मोजणी करताना अनेक शेतकºयांना वंचित ठेवले आहे़ तर काही बोगस नावांचा चिरीमिरी घेऊन यादीत सामवेश केला आहे़ तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही़ त्यामुळे मावेजा वाटपापासून बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी