शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:13 IST

पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयामुळे गोदाकाठचा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे़ मात्र अनेक शेतकºयांच्या जमिनी बॅक वाटरखाली गेल्याने शेतकरी भूमिहिन झाले आहेत़ बॅक वॉटरखाली जाणाºया जमिनीचे मोजमाप करताना पथकाने अनेक शेतकºयांचे नुकसान केले आहे़ मावेजा वाटप सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़फरकंडा शिवारात सर्व्हे नं़ १४४ मध्ये १ हेक्टर ३१ आर जमीन आहे़ यापैकी जवळपास ८९ आर जमीन बॅक वॉटरखाली जात आहे़ या जमिनीचा मोबदला देताना केवळ ३२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे़ त्यामुळे चार शेतकºयांचे प्रत्येकी ८ आरच जमिनीचे पैसे मिळाले आहेत़ परिणामी इतर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे़वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ जायमोक्यावर येऊन पाहणी करून नव्याने सर्व्हेक्षण करावे व तातडीने लाभार्थी शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रसाद पौळ, भगवान पौळ, विठ्ठल पौळ, प्रल्हाद पौळ आदींनी विष्णू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे़दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावेजा वाटपाचे प्रकरण विष्णूपुरी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून रेंगाळत ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे जमिनी जाऊनही शेतकºयांना मावेजासाठी संघर्ष करावा लागत आहे़प्रकल्प यंत्रणेचे दुर्लक्ष : सूड उगावत असल्याची शेतकºयांची तक्रारडिग्रस बंधाºयाचे कामकाज पाहणारे कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे़ शेतकºयांवरील अन्याय दूर करावा, यासाठी वारंवार प्रकल्प कार्यालयाकडे लाभार्थी हेलपाटे मारत आहेत़ मात्र जाणीवपूर्वक शेतकºयांना दुर्लक्षित केले जात आहे़ पाणी सोडताना शेतकरी दरवर्षी विरोध करतात़ याचाच राग मनात धरून अधिकारी व कर्मचारी सूड उगावत असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत़शेतकरी राहिले वंचितपालम तालुक्यातील आरखेड शिवारात गोदावरी व गळाटी नदीच्या काठच्या जमिनी बॅक वॉटरखाली जात आहेत़ पथकाने जमिनीची मोजणी करताना अनेक शेतकºयांना वंचित ठेवले आहे़ तर काही बोगस नावांचा चिरीमिरी घेऊन यादीत सामवेश केला आहे़ तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही़ त्यामुळे मावेजा वाटपापासून बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी