शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

परभणी : जमिनी जाऊनही मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:13 IST

पालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी) : तालुक्यातील फरकंडा शिवारातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅक वॉटरखाली जमिनी जाऊनही शेतकºयांना मोबदला मिळाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्प २ च्या कर्मचारी वर्गाच्या मनमानीचा फटका शेतकºयांना बसत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयामुळे गोदाकाठचा भाग सुजलाम सुफलाम झाला आहे़ मात्र अनेक शेतकºयांच्या जमिनी बॅक वाटरखाली गेल्याने शेतकरी भूमिहिन झाले आहेत़ बॅक वॉटरखाली जाणाºया जमिनीचे मोजमाप करताना पथकाने अनेक शेतकºयांचे नुकसान केले आहे़ मावेजा वाटप सुरू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़फरकंडा शिवारात सर्व्हे नं़ १४४ मध्ये १ हेक्टर ३१ आर जमीन आहे़ यापैकी जवळपास ८९ आर जमीन बॅक वॉटरखाली जात आहे़ या जमिनीचा मोबदला देताना केवळ ३२ आर जमीन संपादित करण्यात आली आहे़ त्यामुळे चार शेतकºयांचे प्रत्येकी ८ आरच जमिनीचे पैसे मिळाले आहेत़ परिणामी इतर शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे़वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ जायमोक्यावर येऊन पाहणी करून नव्याने सर्व्हेक्षण करावे व तातडीने लाभार्थी शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रसाद पौळ, भगवान पौळ, विठ्ठल पौळ, प्रल्हाद पौळ आदींनी विष्णू प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे़दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावेजा वाटपाचे प्रकरण विष्णूपुरी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून रेंगाळत ठेवण्यात आले आहे़ त्यामुळे जमिनी जाऊनही शेतकºयांना मावेजासाठी संघर्ष करावा लागत आहे़प्रकल्प यंत्रणेचे दुर्लक्ष : सूड उगावत असल्याची शेतकºयांची तक्रारडिग्रस बंधाºयाचे कामकाज पाहणारे कार्यालय नांदेड येथे कार्यरत आहे़ शेतकºयांवरील अन्याय दूर करावा, यासाठी वारंवार प्रकल्प कार्यालयाकडे लाभार्थी हेलपाटे मारत आहेत़ मात्र जाणीवपूर्वक शेतकºयांना दुर्लक्षित केले जात आहे़ पाणी सोडताना शेतकरी दरवर्षी विरोध करतात़ याचाच राग मनात धरून अधिकारी व कर्मचारी सूड उगावत असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत़शेतकरी राहिले वंचितपालम तालुक्यातील आरखेड शिवारात गोदावरी व गळाटी नदीच्या काठच्या जमिनी बॅक वॉटरखाली जात आहेत़ पथकाने जमिनीची मोजणी करताना अनेक शेतकºयांना वंचित ठेवले आहे़ तर काही बोगस नावांचा चिरीमिरी घेऊन यादीत सामवेश केला आहे़ तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही़ त्यामुळे मावेजा वाटपापासून बहुतांश शेतकरी वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीWaterपाणी