शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:10 AM

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना पुढाकार घेतला होता. त्यामुळे कर्ज वाटपाची टक्केवारी १०२ टक्क्यांपर्यंत गेली होती; परंतु, २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकांतून उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना बँका दुष्काळी परिस्थितीत पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून आर्थिक मदत करतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी राज्य शासनाने ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यामध्येही जिल्ह्यातील वाणिज्य बँकांनी १२ हजार २२ शेतकºयांना १२१ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी ९०३ शेतकºयांना १५ कोटी ३ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार ६८३ शेतकºयांना २७ कोटी २३ लाख, जिल्ंहा मध्यवर्ती बँकेने ५ हजार ६२५ शेतकºयांना १५ कोटी ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांची परिस्थिती लक्षात न घेता जिल्ह्यातील २२ हजार ३२३ शेतकºयांना केवळ १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.त्यामुळे गतवर्षी जिल्ह्याचा पीक कर्ज वाटपाचा आलेख यावर्षी मात्र केवळ ५० टक्यावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे बँकांनी पीक कर्ज वाटप करताना घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत ढकलणाराच दिसून येत आहे.खरीप : हंगामही ३० टक्क्यांवर४जिल्ह्यातील बँकांनी यावर्षी खरीप पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटप करताना आखडा हात घेतल्याचे दिसून येत आहे.४२०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंमागासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्याची टक्केवारी केवळ ३०.५ टक्के आहे.४त्यामुळे बँकांनी खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक