शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:40 IST

ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़जिल्ह्यात दरवर्षी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते़ संबंधित गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ ज्या गावांमध्ये पाण्याचा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो़; परंतु, ज्या गावांमध्ये पाणी उपलब्ध होवू शकते, अशा ठिकाणी सुरुवातीला विहीर, बोअर अधिग्रहण करून टंचाई निवारणाचा प्रयत्न केला जातो़ तर बहुतांश वेळा पाणीपुरवठा योजनेची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर त्या गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत होवू शकतो़ या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़या अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील गौळवाडी तांडा या गावासाठी ५२ हजार रुपये, बडवणी या गावासाठी ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे़ परभणी तालुक्यामध्ये १० गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ त्यामध्ये हनुमान तांडा येथे ९७ हजार ९००, आळंद ८७ हजार ३००, गव्हा १ लाख १९ हजार २००, पिंपळगाव १ लाख ८९ हजार ७००, किन्होळा १ लाख ९७ हजार ८००, अमदापूर १ लाख ८७ हजार ६००, इठलापूर ७३ हजार ५००, नरसापूर २ लाख १० हजार ५५०, गोविंदपूर २ लाख ७९ हजार २०० आणि मांगणगाव येथे नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ३० हजार ५० रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे़ वरील सर्व गावांमध्ये पाण्याचीटंचाई निर्माण झाल्याने नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केलेल्या रकमेतून तातडीने कामे हाती घ्यावीत आणि गावांना टंचाईपासून मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे़कामांना गती द्या४ग्रामीण भागामध्ये टंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक प्रस्तावही दाखल होत आहेत़ या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास विलंब लागतो़४त्यामुळे निधी मंजूर होवूनही संबंधित गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ तेव्हा एखाद्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांनी तातडीने काम हाती घेऊन गावांतील पाणीटंचाई दूर करावी, अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे करावीत, अशी मागणी होत आहे़चुडाव्यात ५ लाखांचे कामटंचाई निवारणासाठी तात्पुरती पुरक नळ योजना घेण्याची मुभा आहे़ या अंतर्गत चुडावा गावातून प्रस्ताव दाखल झाला असून, जिल्हाधिकाºयांनी ५ लाख ७ हजार २०० रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तात्पुरत्या पुरक नळ योजनेत अंतर्गत जलवाहिनी वाढविली जाते़ तसेच जलस्त्रोतापर्यंतची जलवाहिनी दुरुस्त करण्यात येते़ चुडावा येथील पाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोताला पाणी उपलब्ध आहे़ योजनेची दुरुस्ती केल्यास गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ या उद्देशाने तात्पुरत्या पुरक नळ योजनेच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आह़ेप्रलंबित प्रस्ताव निकाली काढाटंचाई नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींमधून दाखल झालेले विहीर अधिग्रहण, टँकरचे अनेक प्रस्ताव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत़ त्यामुळे गावकºयांना प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर होवून टंचाई निवारणाची आशा लागलेली असते़ दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या स्थानिक स्तरावरच पूर्ण करून हे प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई