शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:40 IST

ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़जिल्ह्यात दरवर्षी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते़ संबंधित गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ ज्या गावांमध्ये पाण्याचा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो़; परंतु, ज्या गावांमध्ये पाणी उपलब्ध होवू शकते, अशा ठिकाणी सुरुवातीला विहीर, बोअर अधिग्रहण करून टंचाई निवारणाचा प्रयत्न केला जातो़ तर बहुतांश वेळा पाणीपुरवठा योजनेची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर त्या गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत होवू शकतो़ या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़या अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील गौळवाडी तांडा या गावासाठी ५२ हजार रुपये, बडवणी या गावासाठी ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे़ परभणी तालुक्यामध्ये १० गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ त्यामध्ये हनुमान तांडा येथे ९७ हजार ९००, आळंद ८७ हजार ३००, गव्हा १ लाख १९ हजार २००, पिंपळगाव १ लाख ८९ हजार ७००, किन्होळा १ लाख ९७ हजार ८००, अमदापूर १ लाख ८७ हजार ६००, इठलापूर ७३ हजार ५००, नरसापूर २ लाख १० हजार ५५०, गोविंदपूर २ लाख ७९ हजार २०० आणि मांगणगाव येथे नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ३० हजार ५० रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे़ वरील सर्व गावांमध्ये पाण्याचीटंचाई निर्माण झाल्याने नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केलेल्या रकमेतून तातडीने कामे हाती घ्यावीत आणि गावांना टंचाईपासून मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे़कामांना गती द्या४ग्रामीण भागामध्ये टंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक प्रस्तावही दाखल होत आहेत़ या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास विलंब लागतो़४त्यामुळे निधी मंजूर होवूनही संबंधित गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ तेव्हा एखाद्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांनी तातडीने काम हाती घेऊन गावांतील पाणीटंचाई दूर करावी, अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे करावीत, अशी मागणी होत आहे़चुडाव्यात ५ लाखांचे कामटंचाई निवारणासाठी तात्पुरती पुरक नळ योजना घेण्याची मुभा आहे़ या अंतर्गत चुडावा गावातून प्रस्ताव दाखल झाला असून, जिल्हाधिकाºयांनी ५ लाख ७ हजार २०० रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तात्पुरत्या पुरक नळ योजनेत अंतर्गत जलवाहिनी वाढविली जाते़ तसेच जलस्त्रोतापर्यंतची जलवाहिनी दुरुस्त करण्यात येते़ चुडावा येथील पाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोताला पाणी उपलब्ध आहे़ योजनेची दुरुस्ती केल्यास गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ या उद्देशाने तात्पुरत्या पुरक नळ योजनेच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आह़ेप्रलंबित प्रस्ताव निकाली काढाटंचाई नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींमधून दाखल झालेले विहीर अधिग्रहण, टँकरचे अनेक प्रस्ताव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत़ त्यामुळे गावकºयांना प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर होवून टंचाई निवारणाची आशा लागलेली असते़ दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या स्थानिक स्तरावरच पूर्ण करून हे प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई