शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

परभणी : २९ लाखांतून पाणीटंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:40 IST

ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नळ योजनेच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ परभणी, गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यामधील गावांत २९ लाख ७५० रुपयांच्या कामांना प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ आता ही कामे गतीने पूर्ण करून ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा देण्याचे काम प्रशासनातील अधिकाऱ्यांना करावे लागणार आहे़जिल्ह्यात दरवर्षी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते़ संबंधित गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जातात़ ज्या गावांमध्ये पाण्याचा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो़; परंतु, ज्या गावांमध्ये पाणी उपलब्ध होवू शकते, अशा ठिकाणी सुरुवातीला विहीर, बोअर अधिग्रहण करून टंचाई निवारणाचा प्रयत्न केला जातो़ तर बहुतांश वेळा पाणीपुरवठा योजनेची तात्पुरती दुरुस्ती केल्यानंतर त्या गावाचा पाणीपुरवठा पूर्ववत होवू शकतो़ या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़या अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील गौळवाडी तांडा या गावासाठी ५२ हजार रुपये, बडवणी या गावासाठी ४ लाख ६८ हजार ८०० रुपयांच्या कामांना नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे़ परभणी तालुक्यामध्ये १० गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ त्यामध्ये हनुमान तांडा येथे ९७ हजार ९००, आळंद ८७ हजार ३००, गव्हा १ लाख १९ हजार २००, पिंपळगाव १ लाख ८९ हजार ७००, किन्होळा १ लाख ९७ हजार ८००, अमदापूर १ लाख ८७ हजार ६००, इठलापूर ७३ हजार ५००, नरसापूर २ लाख १० हजार ५५०, गोविंदपूर २ लाख ७९ हजार २०० आणि मांगणगाव येथे नळ योजनेच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ३० हजार ५० रुपयांच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे़ वरील सर्व गावांमध्ये पाण्याचीटंचाई निर्माण झाल्याने नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केलेल्या रकमेतून तातडीने कामे हाती घ्यावीत आणि गावांना टंचाईपासून मुक्त करावे, अशी मागणी केली जात आहे़कामांना गती द्या४ग्रामीण भागामध्ये टंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ टंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक प्रस्तावही दाखल होत आहेत़ या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास विलंब लागतो़४त्यामुळे निधी मंजूर होवूनही संबंधित गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ तेव्हा एखाद्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांनी तातडीने काम हाती घेऊन गावांतील पाणीटंचाई दूर करावी, अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या कामांना प्राधान्य देऊन गतीने कामे करावीत, अशी मागणी होत आहे़चुडाव्यात ५ लाखांचे कामटंचाई निवारणासाठी तात्पुरती पुरक नळ योजना घेण्याची मुभा आहे़ या अंतर्गत चुडावा गावातून प्रस्ताव दाखल झाला असून, जिल्हाधिकाºयांनी ५ लाख ७ हजार २०० रुपये खर्चाच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे़ तात्पुरत्या पुरक नळ योजनेत अंतर्गत जलवाहिनी वाढविली जाते़ तसेच जलस्त्रोतापर्यंतची जलवाहिनी दुरुस्त करण्यात येते़ चुडावा येथील पाणी पुरवठा योजनेच्या जलस्त्रोताला पाणी उपलब्ध आहे़ योजनेची दुरुस्ती केल्यास गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो़ या उद्देशाने तात्पुरत्या पुरक नळ योजनेच्या कामाला जिल्हाधिकाºयांनी मंजुरी दिली आह़ेप्रलंबित प्रस्ताव निकाली काढाटंचाई नियंत्रणासाठी ग्रामपंचायतींमधून दाखल झालेले विहीर अधिग्रहण, टँकरचे अनेक प्रस्ताव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत़ त्यामुळे गावकºयांना प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो मंजूर होवून टंचाई निवारणाची आशा लागलेली असते़ दाखल झालेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या स्थानिक स्तरावरच पूर्ण करून हे प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई