शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

परभणी : मुळी बंधाऱ्यात होईना पाण्याची साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:11 IST

तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी तसेच इतर छोट्या-मोठ्या नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. तालुक्यात असलेल्या लघू पाझर तलावांनी तळ गाठल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील मुळी परिसरात गोदावरी नदीपात्रात मुळी बंधाराला उभारण्यात आला. या बंधाºयाला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे नदीला आलेल्या पुरात निखळून पडल्याने बंधाºयात साचणारे पावसाचे पाणी दरवाजांअभावी वाहून जात आहेत. यामुळे नदीपात्र कोरडेठाक पडून गोदाकाठी असलेल्या गावांना ही कधी नव्हे त्या भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या बंधाºयाला तत्काळ उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी या अनेक वेळा करण्यात आली; परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या बंधाºयाला पावसाळ्यापूर्वीच उचलपद्धतीचे दरवाजे बसविले असते तर लाभक्षेत्रातील शेतकºयांना व गोदा काठावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली नसती, असे बोलले जात आहे.उपाययोजनांसाठी नागरिकांनी घेतली तहसील प्रशासनाकडे धाव४गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि मुळी बंधाºयाच्या अनुषंगाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात यासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनावर निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मणराव गोळेगावकर, दुष्काळ निवारण समितीचे तालुकाध्यक्ष ओमकार पवार, शिवाजी कदम, माणिकराव कदम, सुरेश इखे, सुनिल पौळ, शिवाजी जाधव, गोपीनाथराव भोसले आदींच्या सह्या आहेत.प्रशासनासमोर मांडल्या मागण्या४दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशावर बंदी घालावी, जनावरांच्या संख्येनुसार गावागावात चारा छावण्या उभाराव्यात, मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत. गोरगरिब शेतकरी, शेतमजूर आदी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे, अंशदायी उंबरठा उत्पन्नावर अधारित पीक कापणी प्रयोग रद्द करून दुष्काळी भागातील नदीपात्रात पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.पाटबंधारे विभागाची टाळाटाळ४मुळी बंधाºयाचे दरवाजे निखळून पडून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे; परंतु, अद्यापही या बंधाºयाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने पाटंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी