शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मुळी बंधाऱ्यात होईना पाण्याची साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:11 IST

तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी तसेच इतर छोट्या-मोठ्या नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. तालुक्यात असलेल्या लघू पाझर तलावांनी तळ गाठल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील मुळी परिसरात गोदावरी नदीपात्रात मुळी बंधाराला उभारण्यात आला. या बंधाºयाला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे नदीला आलेल्या पुरात निखळून पडल्याने बंधाºयात साचणारे पावसाचे पाणी दरवाजांअभावी वाहून जात आहेत. यामुळे नदीपात्र कोरडेठाक पडून गोदाकाठी असलेल्या गावांना ही कधी नव्हे त्या भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या बंधाºयाला तत्काळ उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी या अनेक वेळा करण्यात आली; परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या बंधाºयाला पावसाळ्यापूर्वीच उचलपद्धतीचे दरवाजे बसविले असते तर लाभक्षेत्रातील शेतकºयांना व गोदा काठावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली नसती, असे बोलले जात आहे.उपाययोजनांसाठी नागरिकांनी घेतली तहसील प्रशासनाकडे धाव४गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि मुळी बंधाºयाच्या अनुषंगाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात यासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनावर निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मणराव गोळेगावकर, दुष्काळ निवारण समितीचे तालुकाध्यक्ष ओमकार पवार, शिवाजी कदम, माणिकराव कदम, सुरेश इखे, सुनिल पौळ, शिवाजी जाधव, गोपीनाथराव भोसले आदींच्या सह्या आहेत.प्रशासनासमोर मांडल्या मागण्या४दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशावर बंदी घालावी, जनावरांच्या संख्येनुसार गावागावात चारा छावण्या उभाराव्यात, मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत. गोरगरिब शेतकरी, शेतमजूर आदी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे, अंशदायी उंबरठा उत्पन्नावर अधारित पीक कापणी प्रयोग रद्द करून दुष्काळी भागातील नदीपात्रात पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.पाटबंधारे विभागाची टाळाटाळ४मुळी बंधाºयाचे दरवाजे निखळून पडून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे; परंतु, अद्यापही या बंधाºयाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने पाटंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी