शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

परभणी : मुळी बंधाऱ्यात होईना पाण्याची साठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:11 IST

तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने या बंधाºयात पाण्याची साठवण होत नाही. त्यामुळे या बंधाºयाला उचल पद्धतीचे दरवाजे तत्काळ बसवावेत, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षी तालुक्यात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी तसेच इतर छोट्या-मोठ्या नद्या कोरड्याठाक पडल्या आहेत. तालुक्यात असलेल्या लघू पाझर तलावांनी तळ गाठल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तालुक्यातील मुळी परिसरात गोदावरी नदीपात्रात मुळी बंधाराला उभारण्यात आला. या बंधाºयाला प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे नदीला आलेल्या पुरात निखळून पडल्याने बंधाºयात साचणारे पावसाचे पाणी दरवाजांअभावी वाहून जात आहेत. यामुळे नदीपात्र कोरडेठाक पडून गोदाकाठी असलेल्या गावांना ही कधी नव्हे त्या भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. या बंधाºयाला तत्काळ उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी या अनेक वेळा करण्यात आली; परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या बंधाºयाला पावसाळ्यापूर्वीच उचलपद्धतीचे दरवाजे बसविले असते तर लाभक्षेत्रातील शेतकºयांना व गोदा काठावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली नसती, असे बोलले जात आहे.उपाययोजनांसाठी नागरिकांनी घेतली तहसील प्रशासनाकडे धाव४गंगाखेड तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि मुळी बंधाºयाच्या अनुषंगाने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात यासह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनावर निवेदनावर कॉ. राजन क्षीरसागर, लक्ष्मणराव गोळेगावकर, दुष्काळ निवारण समितीचे तालुकाध्यक्ष ओमकार पवार, शिवाजी कदम, माणिकराव कदम, सुरेश इखे, सुनिल पौळ, शिवाजी जाधव, गोपीनाथराव भोसले आदींच्या सह्या आहेत.प्रशासनासमोर मांडल्या मागण्या४दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या बेसुमार वाळू उपशावर बंदी घालावी, जनावरांच्या संख्येनुसार गावागावात चारा छावण्या उभाराव्यात, मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत. गोरगरिब शेतकरी, शेतमजूर आदी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून द्यावे, अंशदायी उंबरठा उत्पन्नावर अधारित पीक कापणी प्रयोग रद्द करून दुष्काळी भागातील नदीपात्रात पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्या तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.पाटबंधारे विभागाची टाळाटाळ४मुळी बंधाºयाचे दरवाजे निखळून पडून एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे; परंतु, अद्यापही या बंधाºयाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याने पाटंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी