शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

परभणी : राजकीय स्वार्थासाठी पळविले पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 01:20 IST

तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हाताने मदत केल्याने शेतकºयांचा वाली कोणी आहे की, नाही, अशी भावना शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी ) : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याचे पाणी पळविल्यानंतर नांदेड जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय स्वार्थासाठी डिग्रसचे पाणी पळविण्यात आले असून पालम तालुक्यातील शेतकºयांची माती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनानेही नांदेडच्या पुढाºयांना मोकळ्या हाताने मदत केल्याने शेतकºयांचा वाली कोणी आहे की, नाही, अशी भावना शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.पालम तालुक्यातील डिग्रस बंधारा हा नांदेडच्या सोयीसाठी करण्यात आल्याचा प्रत्यय वारंवार शेतकºयांना येत आहे. या बंधाºयासाठी स्थानिक शेतकºयांची शेती पाण्याखाली गेली आहे. पाणी मात्र नांदेडसाठी सोडले जात आहे. २२ डिसेंबर रोजी चार तासात २० दलघमी पाणी देण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नांदेडसाठी ६८ टक्के तर पालम तालुक्यासाठी ३२ टक्के तरतूद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील निष्क्रिय पुढाºयांमुळे या आरक्षणात अजूनही बदल झालेला नाही. विष्णुपुरी बंधाºयात मुबलक पाणीसाठा असातनाही डिग्रसचे पाणी घेण्यात आल्याने स्थानिक शेतकºयांत संतापाची लाट उसळली आहे. पाणी नेल्यानंतर नांदेड शहरातील दोन आमदारांतील राजकारण रंगात आले आहे. शेतकºयांना पाणी देण्यासाठी डिग्रसच्या पाण्याचा वापर केला जात आहे, हेच यावरून दिसून येत आहे. पिण्यासाठी पाणी या नावाखाली नांदेड जिल्ह्यातील शेती सुजलामसुफलाम केली जात असून पालम, पूर्णा तालुक्यातील शेतकºयांची राखरांगोळी केली जात आहे. प्रत्येक वेळी पाणी देताना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्थानिक जनतेला विश्वासात घेत असतात. यावेळी मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. हक्काचे पाणी असूनही रातोरात जिल्हा प्रशसनाच्या मदतीने नांदेडच्या पुढाºयांनी पाणी पळविले आहे. जिल्हा प्रशासनाने स्थानिक जनतेची माती करीत नांदेडला सढळ हाताने पाणी सोडून दिले आहे. यामुळे शासनाच्या कारभारावर शेतकरीवर्ग व स्थानिक जनता नाराज आहे. डिग्रस बंधाºयात पाणीसाठा शिल्लक नसल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे.आरक्षण डावलून दिले पाणीपालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात ६८ टक्के पाणी नांदेडसाठी आणि ३२ टक्के पाणी पालम तालुक्यासाठी राखीव ठेवले आहे. बंधाºयात केवळ २६ दलघमी पाणी असताना २० दलघमी पाणी नांदेड जिल्ह्यासाठी सोडण्यात आले. सोडलेले पाणी आरक्षणाच्या कोणत्या नियमानुसार सोडले, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. २६ दलघमीतून केवळ ६८ टक्के पाणी नांदेड जिल्ह्याला देणे आवश्यक होते. परंतु पालम तालुक्यासाठी आरक्षित केलेले पाणीही नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे पालम तालुक्यालावर एका अर्थाने अन्यायच करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई