शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:18 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील हातपंप व विहिरींचे पाणी आटले आहे़ परिणामी जिंंतूर तालुक्यातील कौसडी, बोरी व इतर गावे या १६ गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे़ मात्र ६ व ७ जून रोजी वादळी वाºयामुळे या योजनेचे विद्युत पोल पडल्यामुळे या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे़ यामुळे बोरी व कौसडी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे़ महावितरणने ग्रामस्थांची पाण्यासंदर्भात पाण्यासाठी होणारी गैरसोय तातडीने पावले उचलत वादळी वाºयात वीज खांबांचे व तारांचे झालेले नुकसान बाजुला सारत नव्याने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे; परंतु, विद्युत पुरवठा सुरळीत झाला असला तरी या योजनेंतर्गत पाणीपुवठा करणारी विद्युत मोटार जळाल्याने ही योजना सध्या बंद आहे़ महावितरणने ज्या प्रमाणे वीज दुुरुस्तीची कामे केली़ मात्र विद्युत मोटार जळाल्याने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा बंद असून, ही संबंधित विभाग व यंत्रणा याकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांना दोन-तीन किमी पायपीट करून पाणी आणण्यास भाग पाडत आहे़ त्यामुळे याकडे तत्काळ संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय थांबवून न्याय द्यावा, अशी मागणी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांतून होत आहे दरम्यान, कधी विद्युत पुरवठ्यामुळे तर कधी वीज बिलामुळे तर कधी विद्युत उपकरणे जळाल्याने या योजनेंतर्गत होणारा पाणीपुरवठा वारंवार बंद पडत आहे़ ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती दूर व्हावी, या उद्देशाने अंमलात आणलेली ही योजना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिन भूमिकेमुळे व निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांसाठी गैरसोयीची ठरत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा करताना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे़प्रशासकीय मान्यतेत अडकला निधी१६ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत या योजनेच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी दीड महिन्यांपूर्वी मंजूर केला होता; परंतु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून हा निधी उचलण्यास मान्यता मिळत नसल्यामुळे तो अद्यापही उपलब्ध झालेला नाही़ परिणामी योजनेची विद्युत मोटार, विद्युत रोहित्र दुरुस्ती व इतर खर्चासाठी पैसे उपलब्ध नसल्याने दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत़ यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़ याबाबत जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आदेशित करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई