शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजनेचे पंधरा दिवसांपासून पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:18 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गतची विद्युत मोटार जळाल्याने १५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे़ परिणामी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावातील हातपंप व विहिरींचे पाणी आटले आहे़ परिणामी जिंंतूर तालुक्यातील कौसडी, बोरी व इतर गावे या १६ गाव पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे़ मात्र ६ व ७ जून रोजी वादळी वाºयामुळे या योजनेचे विद्युत पोल पडल्यामुळे या योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे़ यामुळे बोरी व कौसडी येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे़ महावितरणने ग्रामस्थांची पाण्यासंदर्भात पाण्यासाठी होणारी गैरसोय तातडीने पावले उचलत वादळी वाºयात वीज खांबांचे व तारांचे झालेले नुकसान बाजुला सारत नव्याने ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे; परंतु, विद्युत पुरवठा सुरळीत झाला असला तरी या योजनेंतर्गत पाणीपुवठा करणारी विद्युत मोटार जळाल्याने ही योजना सध्या बंद आहे़ महावितरणने ज्या प्रमाणे वीज दुुरुस्तीची कामे केली़ मात्र विद्युत मोटार जळाल्याने ग्रामस्थांचा पाणीपुरवठा बंद असून, ही संबंधित विभाग व यंत्रणा याकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांना दोन-तीन किमी पायपीट करून पाणी आणण्यास भाग पाडत आहे़ त्यामुळे याकडे तत्काळ संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय थांबवून न्याय द्यावा, अशी मागणी बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांतून होत आहे दरम्यान, कधी विद्युत पुरवठ्यामुळे तर कधी वीज बिलामुळे तर कधी विद्युत उपकरणे जळाल्याने या योजनेंतर्गत होणारा पाणीपुरवठा वारंवार बंद पडत आहे़ ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती दूर व्हावी, या उद्देशाने अंमलात आणलेली ही योजना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासिन भूमिकेमुळे व निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांसाठी गैरसोयीची ठरत आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा करताना येणाºया अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे़प्रशासकीय मान्यतेत अडकला निधी१६ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत या योजनेच्या दुरुस्तीसाठी ५ लाख रुपयांचा निधी दीड महिन्यांपूर्वी मंजूर केला होता; परंतु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून हा निधी उचलण्यास मान्यता मिळत नसल्यामुळे तो अद्यापही उपलब्ध झालेला नाही़ परिणामी योजनेची विद्युत मोटार, विद्युत रोहित्र दुरुस्ती व इतर खर्चासाठी पैसे उपलब्ध नसल्याने दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत़ यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे़ याबाबत जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आदेशित करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई