शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

परभणी : वीजप्रश्नी शिवसेनेचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:36 IST

शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांना अखंडितपणे वीज उपलब्ध करुन द्यावी तसेच विद्युत रोहित्र द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाºयांना घेराव घालण्यात आला.विजेच्या प्रश्नावर सातत्याने महावितरणच्या कामकाजावर विविध राजकीय पक्षांकडून टीका केली जात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या संदर्भात महावितरण कार्यालयात आंदोलन होण्याची प्रकरणे वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी खा.बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक व शेतकरी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले.यावेळी खा.जाधव यांनी प्रभारी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना शेतकºयांना अखंडित वीज पुरवठा व विद्युत रोहित्राच्या प्रश्नावरुन धारेवर धरले. यावेळी अधीक्षक अभियंता जाधव यांनी निधीची अडचण सांगितली. त्यानंतर खा.जाधव यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी फोनवर संपर्क साधला व जिल्हा नियोजन समितीतून २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी २० नोव्हेंबर रोजी या संदर्भात महावितरणच्या अधिकाºयांना मुंबई येथे बैठकीसाठी बोलाविले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणकडून शेतकºयांची अडवणूक होत असेल तर शिवसैनिक ते सहन करणार नाहीत. त्यामुळे महावितरणच्या अधिकाºयांनी शेतकºयांची गैरसोय होऊ देऊ नये, असा सज्जड इशाराही खा.जाधव यांनी दिला.परभणी शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक, शेतकरी, अधिकाºयांची उपस्थिती होती. दरम्यान, मुंबई येथील बैठकीत यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन