शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:36 IST

सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण्यात आली.सेलू ते वालूर या मार्गावर राजवाडी, ब्राह्मणगाव, डुघरा, राजा, वालूर या पाच गावांतील २५० ते ३०० विद्यार्थी शिक्षणासाठी सेलू शहरात बसने ये-जा करतात; परंतु, सेलू बसस्थानकातून दुपारी दीडची बसफेरी काही दिवसांपासून वाहकाअभावी रद्द केली जात आहे.शुक्रवारी वालूरकडे जाणारी दुपारी २.१५ ची बसफेरी चालक उपलब्ध नसल्याने बसस्थानकात उभी राहिली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रक गणेश पवार यांनी घेराव घालून जाब विचारला. दुपारी दीड वाजेची वालूरकडे जाणारी बसफेरी अनेक दिवसांपासून वाहक व चालकाअभावी रद्द केली जात आहे. त्यामुळे वालूर मार्गावरील विद्यार्थ्यांना तासंतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वादोन व तीन वाजेच्या दोन्ही बसफेºया रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली.दुपारच्या बसफेºया सातत्याने रद्द होत असल्याने आणि कधी कधी उशिराने बस लागल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. बसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही.वालूर मार्गावरील बसफेºयांचे नियोजन कोलमडले आहे. वाहतूक नियंत्रकही विद्यार्थ्यांना उत्तरे देत नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी संतप्त होत वाहतूक नियंत्रक गणेश पवार यांना घेराव घालून आंदोलन केले. सेलू-वालूर या मार्गावर नियमित बसफेºया सोडण्यात येतील, असे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घेराव आंदोलन मागे घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.आगारप्रमुखांना : विद्यार्थ्यांचे साकडेसेलू-वालूर या मार्गावरील बसफेºयांचे वेळापत्रक अनियमित झाले आहे. तसेच रद्दही केल्या जात आहेत. वेळेवर बस मिळत नसल्याने मासिक पास असूनही विद्यार्थ्याना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. फेºया रद्द होण्याचे प्रकारही वाढले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. पाथरी आगाराने नियमित व वेळेवर बसफेºया सोडाव्यात, अशी मागणी बालाजी हरकळ व विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे २१ सप्टेंबर रोजी पाथरी येथील आगारप्रमुखांकडे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थीagitationआंदोलन