शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

परभणी : गोदावरी नदी काठावरील गावेही पाणीटंचाईने वेढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:05 IST

तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांनाही यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.यावर्षी सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचे वेढले आहे. चार वर्षापासून पाऊस काळ कमी असल्याने यावर्षी टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. विहीर, बोअरचे पाणी आटल्याने दोन महिन्यांपासून नागरिकांना पाणीटंचाई सामना करावा लागत आहे. यापुढे ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणीटंचाई वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेत शिवारांमध्ये भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात आहे; परंतु, नदीपात्रात पाणी नसल्याने त्याचा परिणाम भूजल पातळीवर झाला आहे. परिणामी गोदाकाठच्या गावांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे यावर्षी सोनपेठ तालुका पाणीटंचाईच्या विळख्याने वेढला असून ग्रामस्थ टंचाईने त्रस्त झाले आहेत.तालुका प्रशासनाने सुरू केल्या उपाययोजना४मागील वर्षी तालुक्यात ३० गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. यावर्षी देखील अशीच परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विहीर, बोअर अधिग्रहण केले जात आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन या उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ