शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

परभणी : ग्रामस्थांनी बंद पाडले पाणीपुरवठा योजनेचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:00 IST

येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुरु असलेले पाईपलाईनचे काम छोटे पाईप वापरण्यात येत असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास बंद पाडले.

लोकमत न्यूज नेटवर्कचारठाणा (परभणी): येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत सुरु असलेले पाईपलाईनचे काम छोटे पाईप वापरण्यात येत असल्याच्या कारणावरुन ग्रामस्थांनी शुक्रवारी दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास बंद पाडले.चारठाणा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. योजनेंतर्गत कान्हा शिवारातील पाझर तलावात दोन विहिरींचे काम पूर्ण झाले असून चारठाणा फाटा येथे एका पाण्याच्या टाकीचे काम सुरु आहे. या टाकीची क्षमता ४१ हजार लिटर असून गावातील पेठविभागात उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या टाकीची क्षमता ७१ हजार लिटर असणार आहे. यावरुन गावातील ३० ते ३५ टक्के भागाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. तसेच गावातील कसबा भागातील ५० ते ५५ टक्के भागासाठी २३ गाव योजनेची जुनी २ लाख लिटर पाणी क्षमता असलेली टाकी उपयोगात राहणार आहे. त्या टाकीला मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या विहिरीतून नवीन पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी देण्यात येणार आहे. या अनुषंगाने चारठाणा टी-पॉर्इंट टाकीवरुन परवीन कॉलनी, पारधीवाडा, संत जनार्दन विद्यालय परिसर, हुतात्मा स्मारक परिसर या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. या भागात दाट लोकवस्ती असल्याने भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता येथे अडीच इंची पाईपलाईन देखील कमी पडणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित एजन्सीने याबाबतच्या अंदाजपत्रकाची माहिती ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी होती. शुक्रवारी टी-पाँईट परिसरात कमी जाडीचे पाईप या कामासाठी वापरले जात असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यामुळे दुपारी ३. ३० वाजेच्या सुमारास येथे ग्रामस्थ जमले व त्यांनी हे काम बंद पाडले. यावेळी ग्रा.पं. सदस्य सय्यद रहेमत अली, अनिस खा पठाण, नसीब खा पठाण, सय्यद रहीम, सय्यद तालेब अली आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती. जोपर्यंत या कामाचे अंदाजपत्रक दाखविले जाणार नाही, तोपर्यंत हे काम करु देणार नाही, असा आक्रमक पवित्रा यावेळी ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे या कामासाठी आलेले कामगार बसून राहिले. आता ग्रामपंचायत व सदरील कंत्राटदार या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.चारठाण्यात होणारी तिसरी पाणीपुरवठा योजना४चारठाणा येथे यापूर्वी १९७२ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये २३ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी देण्यात आले. ही योजनाही ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरली.४परिणामी १९७२ च्या योजनेद्वारेच ग्रामस्थांना सध्या पाणीपुरवठा सुरु आहे; परंतु, वाढलेली लोकसंख्या पाहता या योजनेचे पाणीही ग्रामस्थांना पुरेसे होत नाही. त्यामुळे जवळपास साडेचार कोटी रुपये खर्च करुन मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे या तिसºया पाणीपुरवठा योजनेतून तरी ग्रामस्थांची तहान भागावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी