शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: गोदावरीपात्र कोरडे पडल्याने पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांचीही परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:32 IST

तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यातील गोदावरीनदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़पाथरी तालुक्यात अनेक गावांना गोदावरीनदीचा वारसा लाभला आहे़ यावर्षीच्या गंभीर दुष्काळाचा फटका या गावांनाही बसत असून, ढालेगावपासून ते मुदगलपर्यंतचे गोदावरी पात्र कोरडेठाक पडले आहे़ तालुक्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नदीपात्रात पाणी जमा झाले नाही़ तालुक्याचा अर्धाअधिक भाग गोदावरी नदी लगत आहे़ साधारणत: ४५ किमी अंतराचा हा पट्टा नदीकाठी विसावलेला आहे़ मुदगल आणि ढालेगाव असे दोन उच्च पातळी बंधारे असले तरी सद्यस्थितीला मुदगल बंधारा कोरडा असून, ढालेगाव बंधाऱ्यात एक टक्का पाणी शिल्लक आहे़ ढालेगाव बंधाºयाचे पाणी कमी झाल्याने बॅक वॉटर निवळीपर्यंत आले आहे़ या तालुक्यात दोन बंधारे झाल्याने मागील काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे़ मुदगल आणि ढालेगाव बंधाºयाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उसाची लागवड केली; परंतु, नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पिकांना पाणी देताना उत्पादकांची धावपळ होत आहे़ गोदावरी नदीपात्र कोरडे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे़ परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीच एकीकडे भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे पिकांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे़सद्यस्थितीला गोदावरी नदीपात्रात डबके वजा साचलेल्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न होत आहे़ दिवसभरातून तीन ते चार वेळा विद्युत पंप लावल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत आहे़ या तालुक्यांत पावसाअभावी खरीप, रबी हंगाम तर हातचा गेलाच आहे़; परंतु, आता थोड्याफार पाण्यावर जगविलेले उसाचे पीकही धोक्यात सापडले आहे़ एकंदर गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसह ऊस उत्पादक शेतकºयांचीही परवड सुरू झाली असून, शेतकरी ऊस पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़जायकवाडीचे पाणी सोडण्याची गरजगोदावरी नदीचा पट्टा दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत असून, या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज निर्माण झाली आहे़ जायकवाडीचे पाणी मिळाले तरच गोदाकाठच्या ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळू शकतो़

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ