शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

परभणी: गोदावरीपात्र कोरडे पडल्याने पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांचीही परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:32 IST

तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यातील गोदावरीनदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़पाथरी तालुक्यात अनेक गावांना गोदावरीनदीचा वारसा लाभला आहे़ यावर्षीच्या गंभीर दुष्काळाचा फटका या गावांनाही बसत असून, ढालेगावपासून ते मुदगलपर्यंतचे गोदावरी पात्र कोरडेठाक पडले आहे़ तालुक्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नदीपात्रात पाणी जमा झाले नाही़ तालुक्याचा अर्धाअधिक भाग गोदावरी नदी लगत आहे़ साधारणत: ४५ किमी अंतराचा हा पट्टा नदीकाठी विसावलेला आहे़ मुदगल आणि ढालेगाव असे दोन उच्च पातळी बंधारे असले तरी सद्यस्थितीला मुदगल बंधारा कोरडा असून, ढालेगाव बंधाऱ्यात एक टक्का पाणी शिल्लक आहे़ ढालेगाव बंधाºयाचे पाणी कमी झाल्याने बॅक वॉटर निवळीपर्यंत आले आहे़ या तालुक्यात दोन बंधारे झाल्याने मागील काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे़ मुदगल आणि ढालेगाव बंधाºयाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उसाची लागवड केली; परंतु, नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पिकांना पाणी देताना उत्पादकांची धावपळ होत आहे़ गोदावरी नदीपात्र कोरडे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे़ परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीच एकीकडे भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे पिकांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे़सद्यस्थितीला गोदावरी नदीपात्रात डबके वजा साचलेल्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न होत आहे़ दिवसभरातून तीन ते चार वेळा विद्युत पंप लावल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत आहे़ या तालुक्यांत पावसाअभावी खरीप, रबी हंगाम तर हातचा गेलाच आहे़; परंतु, आता थोड्याफार पाण्यावर जगविलेले उसाचे पीकही धोक्यात सापडले आहे़ एकंदर गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसह ऊस उत्पादक शेतकºयांचीही परवड सुरू झाली असून, शेतकरी ऊस पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़जायकवाडीचे पाणी सोडण्याची गरजगोदावरी नदीचा पट्टा दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत असून, या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज निर्माण झाली आहे़ जायकवाडीचे पाणी मिळाले तरच गोदाकाठच्या ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळू शकतो़

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ