शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

परभणी: गोदावरीपात्र कोरडे पडल्याने पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांचीही परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:32 IST

तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यातील गोदावरीनदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़पाथरी तालुक्यात अनेक गावांना गोदावरीनदीचा वारसा लाभला आहे़ यावर्षीच्या गंभीर दुष्काळाचा फटका या गावांनाही बसत असून, ढालेगावपासून ते मुदगलपर्यंतचे गोदावरी पात्र कोरडेठाक पडले आहे़ तालुक्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नदीपात्रात पाणी जमा झाले नाही़ तालुक्याचा अर्धाअधिक भाग गोदावरी नदी लगत आहे़ साधारणत: ४५ किमी अंतराचा हा पट्टा नदीकाठी विसावलेला आहे़ मुदगल आणि ढालेगाव असे दोन उच्च पातळी बंधारे असले तरी सद्यस्थितीला मुदगल बंधारा कोरडा असून, ढालेगाव बंधाऱ्यात एक टक्का पाणी शिल्लक आहे़ ढालेगाव बंधाºयाचे पाणी कमी झाल्याने बॅक वॉटर निवळीपर्यंत आले आहे़ या तालुक्यात दोन बंधारे झाल्याने मागील काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे़ मुदगल आणि ढालेगाव बंधाºयाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उसाची लागवड केली; परंतु, नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पिकांना पाणी देताना उत्पादकांची धावपळ होत आहे़ गोदावरी नदीपात्र कोरडे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे़ परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीच एकीकडे भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे पिकांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे़सद्यस्थितीला गोदावरी नदीपात्रात डबके वजा साचलेल्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न होत आहे़ दिवसभरातून तीन ते चार वेळा विद्युत पंप लावल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत आहे़ या तालुक्यांत पावसाअभावी खरीप, रबी हंगाम तर हातचा गेलाच आहे़; परंतु, आता थोड्याफार पाण्यावर जगविलेले उसाचे पीकही धोक्यात सापडले आहे़ एकंदर गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसह ऊस उत्पादक शेतकºयांचीही परवड सुरू झाली असून, शेतकरी ऊस पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़जायकवाडीचे पाणी सोडण्याची गरजगोदावरी नदीचा पट्टा दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत असून, या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज निर्माण झाली आहे़ जायकवाडीचे पाणी मिळाले तरच गोदाकाठच्या ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळू शकतो़

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ