शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी: गोदावरीपात्र कोरडे पडल्याने पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांचीही परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 00:32 IST

तालुक्यातील गोदावरी नदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : तालुक्यातील गोदावरीनदीचा परिसरही दुष्काळाच्या छायेत सापडला असून, गोदापात्र कोरडेठाक पडल्याने या भागातील पशु-पक्ष्यांसह ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध सुरू आहे़पाथरी तालुक्यात अनेक गावांना गोदावरीनदीचा वारसा लाभला आहे़ यावर्षीच्या गंभीर दुष्काळाचा फटका या गावांनाही बसत असून, ढालेगावपासून ते मुदगलपर्यंतचे गोदावरी पात्र कोरडेठाक पडले आहे़ तालुक्यात मागील वर्षीच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे नदीपात्रात पाणी जमा झाले नाही़ तालुक्याचा अर्धाअधिक भाग गोदावरी नदी लगत आहे़ साधारणत: ४५ किमी अंतराचा हा पट्टा नदीकाठी विसावलेला आहे़ मुदगल आणि ढालेगाव असे दोन उच्च पातळी बंधारे असले तरी सद्यस्थितीला मुदगल बंधारा कोरडा असून, ढालेगाव बंधाऱ्यात एक टक्का पाणी शिल्लक आहे़ ढालेगाव बंधाºयाचे पाणी कमी झाल्याने बॅक वॉटर निवळीपर्यंत आले आहे़ या तालुक्यात दोन बंधारे झाल्याने मागील काही वर्षांपासून उसाचे क्षेत्र वाढले आहे़ मुदगल आणि ढालेगाव बंधाºयाच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात उसाची लागवड केली; परंतु, नदीपात्रात पाणी शिल्लक नसल्याने पिकांना पाणी देताना उत्पादकांची धावपळ होत आहे़ गोदावरी नदीपात्र कोरडे पडल्याने भूजल पातळी खालावली आहे़ परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीच एकीकडे भटकंती करावी लागत असताना दुसरीकडे पिकांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न ऊस उत्पादकांना पडला आहे़सद्यस्थितीला गोदावरी नदीपात्रात डबके वजा साचलेल्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न होत आहे़ दिवसभरातून तीन ते चार वेळा विद्युत पंप लावल्यानंतर थोड्याफार प्रमाणात पाणी मिळत आहे़ या तालुक्यांत पावसाअभावी खरीप, रबी हंगाम तर हातचा गेलाच आहे़; परंतु, आता थोड्याफार पाण्यावर जगविलेले उसाचे पीकही धोक्यात सापडले आहे़ एकंदर गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांसह ऊस उत्पादक शेतकºयांचीही परवड सुरू झाली असून, शेतकरी ऊस पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत़जायकवाडीचे पाणी सोडण्याची गरजगोदावरी नदीचा पट्टा दुष्काळाच्या तीव्र झळा सहन करीत असून, या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची गरज निर्माण झाली आहे़ जायकवाडीचे पाणी मिळाले तरच गोदाकाठच्या ग्रामस्थांना टंचाईपासून दिलासा मिळू शकतो़

टॅग्स :parabhaniपरभणीgodavariगोदावरीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ