शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

परभणी : स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी सरसावले जांब येथील ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:14 AM

देशपातळीवर स्वच्छतेचे वारे वाहत असताना स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन तालुक्यातील जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानमूमीच्या सुशोभिकरणाचा वसा हाती घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशपातळीवर स्वच्छतेचे वारे वाहत असताना स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन तालुक्यातील जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानमूमीच्या सुशोभिकरणाचा वसा हाती घेतला आहे.गावागावात ग्रामस्वच्छता मोहीम राबविली जात असताना गाव परिसरातील स्मशानभूमींची मात्र दुरवस्था असल्याचे पहावयास मिळते. हीच बाब लक्षात घेऊन जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच झरी येथील स्मशानभूमीची पाहणी केली आणि त्यानंतर जांब येथील स्मशानभूमीही नीटनिटकी व सुशोभित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येकजण आपापल्या परीने या कामात सहभाग नोंदवित आहे. त्यातूनच दररोज स्मशानभूमी परिसराच्या स्वच्छतेबरोबरच इतर उपक्रम राबविले जात आहेत. या भागात मागील वर्षी एकूण ३७० झाडे लावली होती. या झाडांच्या संवर्धनासह यावर्षी आणखी झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. तसेच स्मशानभूमी परिसरात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौदाचे बांधकाम करण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी १० बाय १० आकाराचे ओटे बांधले असून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी लोकवर्गणीतून एक बोअरही घेण्यात आला आहे.लोकवर्गणीतून सुशोभीकरणस्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी जांब येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली आहे. लोकवर्गणी आणि लोकसहभागातूनच कामे हाती घेण्यात आली आहेत. गावातील ५० ते ६० युवक आणि ज्येष्ठ नागरिक या मोहिमेत सहभागी झाले असून या पावसाळ्यात स्मशानभूमी परिसरात १ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पेडगाव तलावातील गाळ आणून तो स्मशानभूमीत टाकण्याचा मानस येथील ग्रामस्थांनी बोलून दाखविला.मंदिराचे भूमिपूजनस्मशानभूमी परिसरात लोकसहभागातून शंकराचे मंदिर उभारणीचे कामही हाती घेण्यात आले आहे. कांतराव झरीकर यांच्या हस्ते शुक्रवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पाच एकरचा हा परिसर सुशोभित करण्यासाठी जांब येथील ग्रामस्थ हिरीरीने सहभागी होत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणी