शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

परभणी : अडीच लाख शेतकऱ्यांचे अर्ज झाले अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:12 IST

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७७३ खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांचे अर्ज अपलोड झाल्याने या शेतकºयांना आता या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७७३ खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांचे अर्ज अपलोड झाल्याने या शेतकºयांना आता या योजनेअंतर्गत दरवर्षी ६ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे.केंद्र शासनाने फेब्रुवारी महिन्यात देशात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली होती. त्यानुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने ही योजना राज्यात १०० टक्के लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचे १ फेब्रुवारी २०१९ पर्यतचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण धारणक्षेत्र २ हेक्टरपर्यंत असेल अशा पात्र कुटुंबियास २ हजार रुपयांचा एक हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात वर्षभरात ६ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १ फेब्रुवारी २०१९ पर्यंत संबंधित खातेदार शेतकरी कुटुंबियाच्या नावे असलेली जमीनधारणा लक्षात घेऊन १ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.या योजनेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार आतापर्यत परभणी तालुक्यातील ७९ हजार ३९१ पैकी ४१ हजार ५६२, सेलू तालुक्यातील ५१ हजार ५६७ पैकी ३० हजार ४२५, जिंतूर तालुक्यातील ७३ हजार ३६७ पैकी ४६ हजार ६५, पाथरी तालुक्यातील ३९ हजार ८७३ पैकी २२ हजार ९९३, मानवत तालुक्यातील ३५ हजार ७२७ पैकी २२ हजार ६५८, सोनपेठ तालुक्यातील ३० हजार ९६९ पैकी १८ हजार ५५, गंगाखेड तालुक्यातील ५६ हजार ४१ पैकी ३१ हजार ३९४, पालम तालुक्यातील ४२ हजार ७०१ पैकी २४ हजार २४५ आणि पूर्णा तालुक्यातील ५५ हजार १५१ पैकी २८ हजार ८२९ अशा जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७८३ पैकी २ लाख ६६ हजार २२६ शेतकºयांनी लाभासाठीचे अर्ज अपलोड केले आहेत. या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्थरावर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. या माध्यमातून नियमितपणे या योजनेचा आढावा प्रशासकीय पातळीवरुन घेतला जात आहे. अद्यापही जिल्ह्यातील तब्बल १ लाख ९८ हजार ५५७ शेतकºयांनी अर्ज दाखल केलेले नाहीत. या शेतकºयांनी अर्ज केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.८५ टक्के कुटुंबिय अपेक्षितच्प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील किमान ८५ टक्के कुटुंबियांना लाभ मिळावा, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील ४ लाख ६४ हजार ७८३ पैकी किमान ३ लाख ९५ हजार ६१ लाभार्थ्यांना लाभ मिळावा, असे प्रशासनाला वाटते. त्या दृष्टीकोणातून प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जात आहे.च्या योजनेचा लाभ जमीनधारणा करणारी संस्था, संवैधानिक पद धारण करणारे आजी, माजी व्यक्ती, आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, जि. प. अध्यक्ष, महापौर, केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारितील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांधील नियमित अधिकारी, कर्मचारी, मागच्या वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यावसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ आदींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तशी अट प्रशासनाने लागू केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार