शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:41 IST

यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.सोनपेठ तालुक्यात ज्वारीचे चांगले उत्पन्न होते. त्यामुळे ज्वारीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात. सोनपेठ तालुका हा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात प्रमुख पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर ही पिके नगदी पीक म्हणून ओळखली जातात.तर रब्बी हंगामातील गहू व ज्वारी ही पिके दररोजच्या आहारातील भाकरीसाठी घेतली जातात. या भागातील शेतीवर निर्भर असणारे शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करुन उत्पन्न घेतात; परंतु, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तो ही पहिल्या दोन महिन्यातच झाला. रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर ठरणारा परतीचा पाऊस तालुक्यात झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओलावा नसल्याने ज्वारी व गहू ही पिके शेतकºयांनी घेतलीच नाहीत. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकºयांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली असली तरी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने साठवण स्त्रोतांमध्ये ठणठणात आहे. त्यामुळे पेरलेले उगवेल व उगवलेले जगेल, याची खात्री देता येत नाही.गेल्या वर्षी १७०० ते २ हजार रुपये स्थिरावलेला ज्वारीचा दर गत तीन महिन्यांपासून वाढत आहे. सध्या बाजारपेठेत ३ हजार ते ३५०० रुपयांवर ज्वारीचा भाव गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी निश्चित महाग झाली आहे.जिल्ह्यात २१ टक्के ज्वारीची पेरणीयावर्षी भर पावसाळ्यात पाऊस बरसलाच नाही. त्यातच परतीच्या पावसानेही शेतकºयांना आकाशाकडेच बघण्याची वेळ आणली. दरवर्षी परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, करडई व हरभºयाची पेरणी करतो. मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाण्याअभावी शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे. जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५९ हजार ७८ हेक्टरवर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच २१.६२ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात ज्वारीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार