शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:41 IST

यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.सोनपेठ तालुक्यात ज्वारीचे चांगले उत्पन्न होते. त्यामुळे ज्वारीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात. सोनपेठ तालुका हा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात प्रमुख पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर ही पिके नगदी पीक म्हणून ओळखली जातात.तर रब्बी हंगामातील गहू व ज्वारी ही पिके दररोजच्या आहारातील भाकरीसाठी घेतली जातात. या भागातील शेतीवर निर्भर असणारे शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करुन उत्पन्न घेतात; परंतु, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तो ही पहिल्या दोन महिन्यातच झाला. रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर ठरणारा परतीचा पाऊस तालुक्यात झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओलावा नसल्याने ज्वारी व गहू ही पिके शेतकºयांनी घेतलीच नाहीत. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकºयांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली असली तरी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने साठवण स्त्रोतांमध्ये ठणठणात आहे. त्यामुळे पेरलेले उगवेल व उगवलेले जगेल, याची खात्री देता येत नाही.गेल्या वर्षी १७०० ते २ हजार रुपये स्थिरावलेला ज्वारीचा दर गत तीन महिन्यांपासून वाढत आहे. सध्या बाजारपेठेत ३ हजार ते ३५०० रुपयांवर ज्वारीचा भाव गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी निश्चित महाग झाली आहे.जिल्ह्यात २१ टक्के ज्वारीची पेरणीयावर्षी भर पावसाळ्यात पाऊस बरसलाच नाही. त्यातच परतीच्या पावसानेही शेतकºयांना आकाशाकडेच बघण्याची वेळ आणली. दरवर्षी परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, करडई व हरभºयाची पेरणी करतो. मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाण्याअभावी शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे. जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५९ हजार ७८ हेक्टरवर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच २१.६२ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात ज्वारीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार