शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

परभणी : पांढऱ्या ज्वारीने गाठला ३ हजार रुपयांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:41 IST

यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): यावर्षी रब्बी हंगामात दुष्काळाने ज्वारीची पेरणी झाली नाही. त्यामुळे बाजारपेठेत ज्वारीची आवक घटल्याने १७०० ते २ हजार रुपये असणाºया ज्वारीने सोमवारी ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी चांगलीच महागल्याचे चित्र दिसून येत आहे.सोनपेठ तालुक्यात ज्वारीचे चांगले उत्पन्न होते. त्यामुळे ज्वारीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतात. सोनपेठ तालुका हा खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. रब्बी हंगामात प्रमुख पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व तूर ही पिके नगदी पीक म्हणून ओळखली जातात.तर रब्बी हंगामातील गहू व ज्वारी ही पिके दररोजच्या आहारातील भाकरीसाठी घेतली जातात. या भागातील शेतीवर निर्भर असणारे शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करुन उत्पन्न घेतात; परंतु, यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. तो ही पहिल्या दोन महिन्यातच झाला. रब्बी हंगामातील पिकांना फायदेशीर ठरणारा परतीचा पाऊस तालुक्यात झालाच नाही. त्यामुळे जमिनीत ओलावा नसल्याने ज्वारी व गहू ही पिके शेतकºयांनी घेतलीच नाहीत. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकºयांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली असली तरी पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने साठवण स्त्रोतांमध्ये ठणठणात आहे. त्यामुळे पेरलेले उगवेल व उगवलेले जगेल, याची खात्री देता येत नाही.गेल्या वर्षी १७०० ते २ हजार रुपये स्थिरावलेला ज्वारीचा दर गत तीन महिन्यांपासून वाढत आहे. सध्या बाजारपेठेत ३ हजार ते ३५०० रुपयांवर ज्वारीचा भाव गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची भाकरी निश्चित महाग झाली आहे.जिल्ह्यात २१ टक्के ज्वारीची पेरणीयावर्षी भर पावसाळ्यात पाऊस बरसलाच नाही. त्यातच परतीच्या पावसानेही शेतकºयांना आकाशाकडेच बघण्याची वेळ आणली. दरवर्षी परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, करडई व हरभºयाची पेरणी करतो. मात्र पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील जलस्त्रोत कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाण्याअभावी शेतकºयांनी रब्बी हंगामातील पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला आहे. जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने १ लाख ५९ हजार ७८ हेक्टरवर ज्वारी पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, १३ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३४ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावरच म्हणजेच २१.६२ टक्के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात ज्वारीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार