शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

परभणी : यंदाही बंधाऱ्यातील पाण्याला मोकळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:42 IST

येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयास अद्यापपर्यंत दरवाजे बसविले नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यातही बंधाºयातील पाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): येथील गोदावरी नदीवर बांधलेल्या मुळी बंधाºयास अद्यापपर्यंत दरवाजे बसविले नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यातही बंधाºयातील पाणी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा, या उद्देशाने पाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून २०११ मध्ये मुळी शिवारात निम्न पातळी बंधाºयाची निर्मिती केली. या बंधाºयाला बसविलेले स्वयंचलित दरवाजे २०१२ व २०१६ साली पुराच्या पाण्यात निखळून पडले. त्यामुळे बंधाºयाच्या उभारणीपासून ते आजपर्यंत हा बंधारा कोरडाठाक आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही बंधाºयात पाणीसाठा होत नसल्याने हा बंधारा शोभेची वास्तू ठरत आहे. परिणामी या भागातील शेतकºयांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन दरवर्षी लाखो रुपयांचे नुकसान शेतकºयांना सहन करावे लागत आहे.बंधाºयात बसविलेले स्वयंचलित दरवाजे काढून त्या जागी उचल पद्धतीचे दरवाजे बसवून पाण्याची साठवणूक करावी, अशी मागणी येथील शेतकरी, लोकप्रतिनिधी वारंवार करीत आहेत. मात्र दरवाजांच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने बंधारा कोरडाठाक राहत आहे. गोदावरी नदीपात्रात मुळी बंधारा असूनही परिसरातील नागरिकांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. बंधाºयाच्या दरवाजांचा प्रश्न पावसाळ्यापूर्वीच निकाली काढावा. तसेच बंधाºयाच्या आतील बाजूने पडलेले साहित्य काढूून घेत पात्राचे खोलीकरण करावे, अशी मागणी होत आहे.तर होऊ शकतो पाण्याचा फायदा४गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात ११.३७ दलघमी क्षमतेचा मुळी बंधारा उभारला आहे. बंधाºयाच्या आतील बाजूने पडलेले साहित्य काढून गोदावरी नदीपात्राचे खोलीकरण केल्यास बंधाºयाच्या ओट्याच्या बरोबरीने सांडव्याच्या आतून पाणी साचून राहील. या पाण्याच्या माध्यमातून गोदाकाठच्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघेल. तसेच परिसरातील भूजल पाणीपातळी वाढून दुष्काळापासून दिलासा मिळू शकतो. तेव्हा पाटबंधारे विभागाने नदीपात्राचे खोलीकरण करावे, अशी मागणी होत आहे.गतवर्षीही बंधारा राहिला कोरडठाक४मागील पाच ते सहा वर्षांपासून मुळी बंधाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने या बंधाºयाला वेळीच गेट बसविले असते तर दुष्काळाची दाहकता कमी झाली असती; परंतु, पाटंधारे विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.४मागील वर्षी जिल्ह्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाबरोबरच मुळी बंधाºयातही पाणीसाठा उपलब्ध नसल्याने तालुकावासियांना टंचाईचा सामना करावा लागला.४यावर्षी तरी प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील नागरिकांच्या वतीने होत आहे.प्रशासनाकडून केवळ नाचविले जात आहेत कागदी घोडे४मागील सहा वर्षापासून मुळी बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळात मुळी बंधारा लाभक्षेत्रातील शेतकºयांसह ग्रामस्थ होरपळत असताना या बंधाºयाच्या दरवाजाचा प्रश्न जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडून प्राधान्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक होते.४दरवाजाच्या प्रश्नासाठी केवळ कागदोपत्री घोडे नाचवून पाठपुरावा करीत असल्याचे दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, कोट्यावधी रुपये खर्च करून शेतकºयांना लाभ होईल, या हेतूने बांधण्यात आलेल्या बंधाºयाच्या मुख्य धोरणास हरताळ फासला जात आहे.४विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन पाठपुरावा करीत असताना लोकप्रतिनिधीकडून मात्र आवश्यक तेवढा पाठपुरावा केला जात नसल्यानेही संताप व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणी