शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

परभणी: मोफत पास योजनेतून तीन तालुके वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:45 IST

दुष्काळी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी ३ तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून देण्यात येत असलेल्या मोफत पास योजनेतून वगळण्यात आले आहे

मारोती जुंबडे।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ तालुक्यांपैकी ३ तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने १५ नोव्हेंबरपासून देण्यात येत असलेल्या मोफत पास योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील ४ हजार ५८४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३३७ विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.जिल्ह्यामध्ये यावर्षी २० आॅगस्टनंतर पाऊसच पडला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणारा शेती व्यवसाय कोंडीत सापडला आहे. खरीप पाठोपाठ रबी हंगामही शेतकºयांच्या हातून गेला. पिकातून मिळालेल्या उत्पादनावर वर्षभराचे आर्थिक नियोजन करणाºया शेतकºयांच्या हाती एकही पीक लागले नाही. त्यामुळे शेतकºयांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे संसाराचा दैनंदिन रहाटगाडा चालवावा की, मुलांचे शिक्षण पूर्ण करावे, या पेचात जिल्ह्यातील पालकवर्ग होता. परभणी जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी शहराच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसमधून ये-जा करतात. विद्यार्थ्यांना बसची पास काढण्यासाठी एकूण तिकिटापैकी ३३.३३ टक्के पैसे मोजावे लागतात. हे पैसे विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नव्हते. त्यामुळे शिक्षण कसे घ्यावे, या विवंचनेत दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थी होते.विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने परभणी जिल्ह्यातील परभणी, मानवत, पालम, पाथरी, सेलू व सोनपेठ या सहा तालुक्यांचा दुष्काळी एक व दोन यादीमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे या भागातील सर्वसाधारण व व्यवसायिक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मासिक पास मोफत देण्याचे आदेश ५ नोव्हेंबर रोजी परिवहन विभागाने काढले आहेत. त्यानुसार मानवत, पालम, परभणी, पाथरी, सेलू व सोनपेठ या सहा तालुक्यातील ३ हजार २४७ विद्यार्थ्यांना या मोफत पासचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे महिन्याकाठी लागणारा विद्यार्थ्यांचा ५ लाख ४७ हजार ९४० रुपयांचा खर्च वाचणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतून तीन तालुक्यातील १३३७ विद्यार्थ्यांना वगळले आहे. त्यामुळे राज्य शासन व एसटी महामंडळाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.१ हजार ३३७ विद्यार्थ्यांवर अन्यायराज्य शासनाने दुष्काळ जाहीर करताना पहिल्या यादीमध्ये मानवत, पालम, पाथरी, सेलू, सोनपेठ व परभणी या सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले; परंतु, जिंतूर, गंगाखेड व पूर्णा या तीन तालुक्यांना वगळले होते. दुसºया यादीमध्ये या तालुक्यातील काही मंडळांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समावेश झाला असला तरी महाराष्टÑ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने ९ तालुक्यांपैकी केवळ सहा तालुक्यांतील ३ हजार २४७ विद्यार्थ्यांनाच एसटी महामंडळाच्या मोफत पासचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित ३ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त मंडळांना यादीतून वगळले आहे.४त्यामुळे पूर्णा, जिंंतूर व गंगाखेड या तीन तालुक्यांतील १३३७ विद्यार्थ्यांना मोफत पासपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.नवीन पास मिळणार नाहीएसटी महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या शैक्षणिक सत्राच्या १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ एप्रिल २०१९ पर्यंत मोफत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे नूतनीकरण करणाºया विद्यार्थ्यांनाच हे पास मिळणार आहेत. नव्याने घेण्यात येणाºया विद्यार्थ्यांना हे पास मिळणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थी