शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मसला गावाला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:15 IST

गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.गंगाखेड तालुक्यात यावर्र्षी टंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोदावरी नदीपात्रात पाणीसाठा शिल्लक नाही आणि कोरड्या पडलेल्या नदीपात्रातूून वाळू मोठ्या प्रमाणात उपसा केली जात असल्याने पाण्याचे दूर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.एकेकाळी सुजलाम, सुफलाम असलेल्या गोदावरी काठावरील गावांमध्ये यावर्षी मात्र पाण्यासाठी हंडा घेऊन फिरण्याची वेळ ओढावली आहे. तालुक्यातील मसला या गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने टंचाई वाढली आहे. विहिरी, हातपंपाला पाणी शिल्लक नाही. नळ योजना बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जनावरांची पाण्यासाठी भटकंतीच्मसला गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला गोदावरी पात्र कोरडे पडल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तेव्हा जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी नदीपात्रात खड्डे करण्यास (झरे करण्यास) परवानगी द्यावी, अशी मागणी मसला येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.च्सोमवारी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली. त्यांना गावातील पाण्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर नदीपात्रात खड्डे खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी रामकिशन शिंदे, विनायक शिंदे, बाबासाहेब शिंदे, राजेभाऊ कदम, निवृत्ती शिंदे, अर्जून शिंदे, विशाल कदम, भागवत शिंदे, अरूण शिंदे, उद्धव शिंदे, राम शिंदे, गोविंद शिंदे, केशव भूजबळ आदी उपस्थित होते.१८ हातपंप पडले कोरडेठाकच्मसला गावातील मारोती मंदिर, गोकुळ गल्ली, नगर गल्ली, मुख्य रस्ता, जिल्हा परिषद शाळा आणि जुन्या गावातील सुमारे १८ हातपंप आणि विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. काही हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.च्मागील सहा महिन्यांपासून गावकरी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. परिसरात पाणीसाठा शिल्लक नसून, प्रशासनानेच आता पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ