शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

परभणी : मसला गावाला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:15 IST

गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.गंगाखेड तालुक्यात यावर्र्षी टंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोदावरी नदीपात्रात पाणीसाठा शिल्लक नाही आणि कोरड्या पडलेल्या नदीपात्रातूून वाळू मोठ्या प्रमाणात उपसा केली जात असल्याने पाण्याचे दूर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.एकेकाळी सुजलाम, सुफलाम असलेल्या गोदावरी काठावरील गावांमध्ये यावर्षी मात्र पाण्यासाठी हंडा घेऊन फिरण्याची वेळ ओढावली आहे. तालुक्यातील मसला या गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने टंचाई वाढली आहे. विहिरी, हातपंपाला पाणी शिल्लक नाही. नळ योजना बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जनावरांची पाण्यासाठी भटकंतीच्मसला गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला गोदावरी पात्र कोरडे पडल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तेव्हा जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी नदीपात्रात खड्डे करण्यास (झरे करण्यास) परवानगी द्यावी, अशी मागणी मसला येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.च्सोमवारी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली. त्यांना गावातील पाण्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर नदीपात्रात खड्डे खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी रामकिशन शिंदे, विनायक शिंदे, बाबासाहेब शिंदे, राजेभाऊ कदम, निवृत्ती शिंदे, अर्जून शिंदे, विशाल कदम, भागवत शिंदे, अरूण शिंदे, उद्धव शिंदे, राम शिंदे, गोविंद शिंदे, केशव भूजबळ आदी उपस्थित होते.१८ हातपंप पडले कोरडेठाकच्मसला गावातील मारोती मंदिर, गोकुळ गल्ली, नगर गल्ली, मुख्य रस्ता, जिल्हा परिषद शाळा आणि जुन्या गावातील सुमारे १८ हातपंप आणि विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. काही हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.च्मागील सहा महिन्यांपासून गावकरी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. परिसरात पाणीसाठा शिल्लक नसून, प्रशासनानेच आता पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ