शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मसला गावाला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:15 IST

गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.गंगाखेड तालुक्यात यावर्र्षी टंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोदावरी नदीपात्रात पाणीसाठा शिल्लक नाही आणि कोरड्या पडलेल्या नदीपात्रातूून वाळू मोठ्या प्रमाणात उपसा केली जात असल्याने पाण्याचे दूर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.एकेकाळी सुजलाम, सुफलाम असलेल्या गोदावरी काठावरील गावांमध्ये यावर्षी मात्र पाण्यासाठी हंडा घेऊन फिरण्याची वेळ ओढावली आहे. तालुक्यातील मसला या गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने टंचाई वाढली आहे. विहिरी, हातपंपाला पाणी शिल्लक नाही. नळ योजना बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जनावरांची पाण्यासाठी भटकंतीच्मसला गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला गोदावरी पात्र कोरडे पडल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तेव्हा जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी नदीपात्रात खड्डे करण्यास (झरे करण्यास) परवानगी द्यावी, अशी मागणी मसला येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.च्सोमवारी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली. त्यांना गावातील पाण्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर नदीपात्रात खड्डे खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी रामकिशन शिंदे, विनायक शिंदे, बाबासाहेब शिंदे, राजेभाऊ कदम, निवृत्ती शिंदे, अर्जून शिंदे, विशाल कदम, भागवत शिंदे, अरूण शिंदे, उद्धव शिंदे, राम शिंदे, गोविंद शिंदे, केशव भूजबळ आदी उपस्थित होते.१८ हातपंप पडले कोरडेठाकच्मसला गावातील मारोती मंदिर, गोकुळ गल्ली, नगर गल्ली, मुख्य रस्ता, जिल्हा परिषद शाळा आणि जुन्या गावातील सुमारे १८ हातपंप आणि विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. काही हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.च्मागील सहा महिन्यांपासून गावकरी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. परिसरात पाणीसाठा शिल्लक नसून, प्रशासनानेच आता पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ