शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:25 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.राहाटी बंधाºयातून परभणीकरांना पाणीपुरवठा केला जातो. या बंधाºयामध्ये दरवर्षी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सिद्धेश्वर बंधाºयातून चार आणि निम्न दुधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये परभणीकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यावर्षी पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही जपून पाणी वापरावे लागणार आहे.परभणी शहरासाठी पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या आरक्षण कोट्यातून ३ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली होती. राहाटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १.५ दलघमी असून, एका पाणी पाळीतून मिळालेले पाणी साधारणत: दीड महिना शहरवासियांना पुरणार आहे. सध्या बंधाºयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता आणखी २० दिवस पुरेल एवढा साठा बंधाºयात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच मनपाला पुढील पाणी पाळीचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी सुमारे ८ दलघमी पाणी प्रकल्पातून सोडावे लागते, तेव्हा कुठे बंधाºयात दीड दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आव्हानही मनपासमोर उभे टाकले आहे.दहा दिवसांतून एक वेळा पाणीपरभणी शहरात सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. शहराच्या लोकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरविताना मनपाला कसरत करावी लागते. पाणीटंचाई नसतानाही शहराला ८ ते ९ दिवसांतून एक वेळा पाणी येत होेते. आता १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एक वेळा पाणी सोडल्यानंतर तीन ते चार तास नळांना पाणी राहते. तीन ते चार तास पाणी सोडले तरच ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते. दरम्यान, शहरात पाण्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक भागामध्ये नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरणे झाल्यानंतर नळावाटे पाण्याचा अपव्यय होतो. सर्व नळजोडण्यांना तोट्या बसविणे बंधनकारक केल्यास होणारा पाण्याचा अपव्यय टळू शकतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेला आता कडक धोरण राबवावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प