शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:25 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.राहाटी बंधाºयातून परभणीकरांना पाणीपुरवठा केला जातो. या बंधाºयामध्ये दरवर्षी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सिद्धेश्वर बंधाºयातून चार आणि निम्न दुधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये परभणीकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यावर्षी पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही जपून पाणी वापरावे लागणार आहे.परभणी शहरासाठी पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या आरक्षण कोट्यातून ३ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली होती. राहाटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १.५ दलघमी असून, एका पाणी पाळीतून मिळालेले पाणी साधारणत: दीड महिना शहरवासियांना पुरणार आहे. सध्या बंधाºयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता आणखी २० दिवस पुरेल एवढा साठा बंधाºयात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच मनपाला पुढील पाणी पाळीचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी सुमारे ८ दलघमी पाणी प्रकल्पातून सोडावे लागते, तेव्हा कुठे बंधाºयात दीड दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आव्हानही मनपासमोर उभे टाकले आहे.दहा दिवसांतून एक वेळा पाणीपरभणी शहरात सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. शहराच्या लोकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरविताना मनपाला कसरत करावी लागते. पाणीटंचाई नसतानाही शहराला ८ ते ९ दिवसांतून एक वेळा पाणी येत होेते. आता १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एक वेळा पाणी सोडल्यानंतर तीन ते चार तास नळांना पाणी राहते. तीन ते चार तास पाणी सोडले तरच ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते. दरम्यान, शहरात पाण्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक भागामध्ये नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरणे झाल्यानंतर नळावाटे पाण्याचा अपव्यय होतो. सर्व नळजोडण्यांना तोट्या बसविणे बंधनकारक केल्यास होणारा पाण्याचा अपव्यय टळू शकतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेला आता कडक धोरण राबवावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प