शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परभणी : ‘दुधना’त केवळ ५४ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:19 IST

अनेक शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ ५४ दलघमी पाणी शिल्लक असून हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : अनेक शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ ५४ दलघमी पाणी शिल्लक असून हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागत आहे.निम्न दुधना प्रकल्पातून सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईच्या काळात परभणी, पूर्णा या शहरांनाही प्रकल्पातून पाणी देण्यात आले होते. दुधना नदीपात्रात पाणी सोडल्याने शेकडो गावांची तहान भागली होती. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला नाही. दोन वर्षापूर्वीच्या पाणीसाठ्यावर यंदाच्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला होता. जून महिन्यात परभणी आणि पूर्णा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प सध्या मृतसाठ्यात गेला आहे. जून महिन्यापासून पावसाळा सुरू झाला असून अद्यापपर्यंत मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात थोडीही वाढ झाली नाही.या प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून सेलू शहराला पाणीपुरवठा करताना पालिकेच्या कर्मचाºयांना कसरत करावी लागत आहे. प्रकल्पाच्या बॅकवॉटरमधून पिकांसाठी पाणी घेणाºया शेतकºयांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सध्या या धरणात केवळ ५४ दलघमी पाणी असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३१ मि.मी. पाऊसच्१ जून ते ३ जुलै या काळात निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये केवळ १३१ मि.मी. पाऊस झाला आहे. या पाणलोट क्षेत्रात सुरुवातीला झालेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात थोडीही वाढ झाली नाही.च्औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील पावसाचे पाणी या प्रकल्पात अडविले जाते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाल्यासच निम्न दुधना प्रकल्पात पाणीसाठा होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीWaterपाणीdroughtदुष्काळ