शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय...विमानतळ रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
4
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
5
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
6
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
7
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
8
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
9
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
10
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
11
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
12
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
13
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
14
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
15
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
16
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
18
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
19
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
20
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार

परभणी : हमीभाव केंद्राकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 1:06 AM

तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ) : तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या हमीभाव खरेदी केंद्राने ७५४ शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना देऊनही केवळ १७ शेतकºयांनी २५१ क्विंटल सोयाबीनची या केंद्रावर विक्री केली आहे. दुसरीकडे डिसेंबरअखेरपर्यंत तब्बल ३५ हजार क्विंटल सोयाबीन खाजगी व्यापाºयांना शेतकºयांनी विक्री केला आहे. त्यामुळे हमीभाव मिळत असतानाही शेतकºयांनीच या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे.तालुक्यातील १५ हजार ८३१ हेक्टरवर सोयाबीन आणि २ हजार ४२९ हेक्टरवर मुगाचा पेरा होता. खरीप हंगामाच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने सोयाबीनचे उत्पादन वाढेल, असे दिसून येत होते. मात्र पीक हाताला आले असताना पावसाने खंड दिल्यामुळे पिकांनी माना टाकणे सुरू केले होेते. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला होता. मानवत तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांजवळील सोयाबीन शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाकडे सुमारे ७५४ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. मात्र या पैकी केवळ १७ शेतकºयांनीच आधारभूत खरेदी केंद्रावर माल विक्री करणे पसंत केले आहे. केवळ २५१ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे.शेतकºयांना निकषांची म्हणजे सर्व शेतमाल उत्तम प्रतीचा असणे, आधार कार्ड, सातबारा आदी कागदपत्रांची पूर्तता करून माल विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी करूनही खरेदी सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी या प्रक्रियेला कंटाळले होते. त्यातच केंद्रावर माल विक्री केल्यानंतर कष्टाच्या पैशासाठी वाट पहावी लागत असल्याने खाजगी व्यापाºयांना माल विकून अनेक शेतकरी मोकळे झाले आहेत.३४९९ रुपये हमीभाव असलेले सोयाबीन खुल्या बाजारातील आडत व्यापारी ३२०० रुपये दराने खरेदी करीत आहेत. सोयाबिनचे उत्पादन अधिक असणाºया शेतकºयांनी मात्र दर वाढेल या आशेवर अजूनही सोयाबीन घरात ठेवले आहे.खाजगी बाजारपेठेमध्ये माल विक्री केल्यानंतर शेतकºयांना पैसे नगदी मिळत असल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला माल खाजगी व्यापाºयांना विक्री केला आहे. तालुक्यात डिसेंबरअखेर ३५ हजार क्विंटलवर सोयाबीन खाजगी व्यापाºयांनी शेतकºयांकडून खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीकडे झाली आहे.४शहरातील नवा मोंढा परिसरात तालुका खरेदी विक्री संघाने २२ आॅक्टोबर रोजी खरेदी विक्री संघामार्फत खाजगी गोदामामध्ये भाडेतत्त्वावर शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्र सुरू केले आहे.४या ठिकाणी १३ नोंव्हेंबरपर्यंत ९०० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. शासनाने जिल्हानिहाय प्रती हेक्टरी मूग, उडीद, उत्पादकतेची यादी जाहीर करून शासकीय हमीभाव योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात हेक्टरी केवळ १ क्विटंल ८० किलो इतके मूग खरेदी करण्याची अट घातली होती.्नखाजगी व्यापारपेठच फुललीशासकीय हमीभाव केंद्र उशिराने सुरू झाले. तसेच हक्काच्या पैशांसाठी तीन-तीन महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक शेतकºयांनी खाजगी व्यापारपेठेतच माल विक्री करणे पसंत केले.

टॅग्स :parabhaniपरभणीMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी