शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
2
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
3
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
4
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
5
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
7
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
8
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
9
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
10
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
11
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
12
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
13
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
14
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
15
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
16
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
17
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
18
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
19
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
20
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 

परभणी : कोट्यावधींच्या मालमत्तेची दूरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:33 AM

तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या तीन मोठ्या योजना बंद पडल्या असून या योजनेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेवारस अवस्थेत गंजत आहे. योजनेचे पाणी तर गावात आलेच नाही. मात्र या योजनेवर खर्च झाल्याने दुसरी योजना मंजूर होत नसल्याने ५१ गावांना वेठीस धरल्या गेले आहे.

विजय चोरडिया।लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : तालुक्यातील जीवन प्राधिकरणाच्या तीन मोठ्या योजना बंद पडल्या असून या योजनेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेवारस अवस्थेत गंजत आहे. योजनेचे पाणी तर गावात आलेच नाही. मात्र या योजनेवर खर्च झाल्याने दुसरी योजना मंजूर होत नसल्याने ५१ गावांना वेठीस धरल्या गेले आहे.जिंतूर तालुक्यात २००४-०५ या वर्षी येलदरी जलशायातून २३ गाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेवर ३० कोटी रुपये खर्च करण्यात आला.योजनेतील अक्षम्य चुका, नियोजनाचा अभाव व योजना हस्तांतरित न झाल्याने या योजनेचे पाणी गावात पोहचलेच नाही. या योजनेच्या मोटार बंद अवस्थेत असल्याने त्यांच्यावर गंज चढला आहे. येलदरी परिसरात हे साहित्य पडून आहे. कुºहाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वापर ग्रामस्थ शौचालयासाठी करीत आहेत.बारा गाव योजनचेही हेच हाल आहेत. सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटवर ही योजना चालते. योजनेचे पाणी सुरुवातीच्या दोन वर्षात पाच ते सहा गावांपर्यंत पोहचले; परंतु, लगेच या योजनेत तांत्रिक बिघाड होऊन ही योजना बंद झाली. या योजनेचे भले मोेठे जलशुद्धीकरण केंद्र जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथे आहे. जे बेवारस अवस्थेत पडून आहे. निवळी धरणातून १६ गाव कुपटा योजनेलाही अखेर घरघर लागली आहे. या योजनेवर बोरी, कौसडी व अनेक मोठी गावे आहेत. या योजनेवर १२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. योजनेचे पाणी काही काळ चार ते पाच गावांना मिळत होते. मात्र मागील दोन वर्षांपासून हे वीज बिल न भरल्यामुळे योजनाच बंद पडली आहे.जलशुद्धीकरण केंद्र बनले शौचालय२३ गाव पिंपळगाव काजळे पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र कुºहाडी येथे आहे. या केंद्राचा वापर गावातील ग्रामस्थ शौचालयासाठी करीत आहेत. तसेच अवैध धंदे, जुगार व दारू पिणाऱ्यांचा अड्डा हे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे चोहू बाजूने साचलेली घाण व गवत यामुळे हे केंद्र रोगराईचे केंद्र बनले आहे. या केंद्रातील लाखो रुपयांचे साहित्य, मशिनरी धूळ खात पडून आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater shortageपाणीटंचाई