शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:03 AM

दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी दिली़वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात २६ एप्रिल रोजी पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ या प्रसंगी रस्तोगी बोलत होते़ कार्यक्रमास कुलगुरु डॉ़ अशोक ढवण, अकोला येथून डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ विकास भाले, हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ़ रवींद्र चारी, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे व्यवस्थापक डॉ़ एऩपी़ सिंग, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, डॉ़डी़एम़ मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती़रस्तोगी म्हणाले, कमी पर्जन्यमानात रुंद वरंबा व सरी पद्धतीने पिकांची लागवड केल्यास मृद व जलसंवर्धन होऊन चांगले उत्पादन घेता येते़ त्यामुळे या तंत्रज्ञानाबाबत विस्तार कार्यकर्ते व शेतकºयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ कमी पाण्यात फळबाग व्यवस्थापनाचे कमी खर्चिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असून, ते शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे़मराठवाडा व विदर्भात खरिपातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे़; परंतु, ज्वारीचे पीक पाण्याचा ताण सहन करणारे असून, मानवास अन्न आणि जनावरांना चारा पुरविणारे असल्याने ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत़बीटी कपाशी ऐवजी कपाशीचे सरळ व देशी वाणाची लागवड तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली केल्यास कमीत खर्चात शाश्वत उत्पादन घेता येईल़ तंत्रज्ञानाच्या आधारे शेतमालाचे उत्पादन वाढू शकेल़ शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी योग्य बाजारभाव, काढणी पश्चात तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, साठवणूक व विपणन व्यवस्था आदींचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे़, असे ते म्हणाले़पोक्रा अंतर्गत गावांत कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी शेती शाळेचे आयोजन केले जाणार आहे़ प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावसमुहातील प्रत्येक गावांचे सूक्ष्म नियोजन आराखडे तयार करून ग्रामसभेच्या मान्यतेने व ग्रामसंजीवनी समितीद्वारे गावामध्ये हाती घ्यावयाच्या उपाययोजनांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी डॉ़ अशोक ढवण, डॉ़ विलास भाले, डॉ़चारी, डॉ़ सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ डॉ़ आऱएऩ खंदारे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़विजय कोळेकर यांनी आभार मानले़ कार्यशाळेस परभणी, अकोला, राहुरी कृषी विद्यापीठातील तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मुंबई येथील आयआयटी, कृषी विभागातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़५ हजार गावांमध्ये प्रकल्प४पोक्रा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सध्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांसह राज्यातील ५ हजार १४२ गावांत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे़४या प्रकल्पांतर्गत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या शिफारशी व हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून केला जात आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीuniversityविद्यापीठ