शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

परभणी तालुक्यात केवळ ३२ घरे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:37 IST

प्रत्येकाला आपल्या हक्काचा निवारा मिळावा, या उद्दात हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी केवळ ३२ घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अद्यापही ३७३ घरे अपूर्ण असल्याचे पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीवरुन उघड झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: प्रत्येकाला आपल्या हक्काचा निवारा मिळावा, या उद्दात हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी परभणी तालुक्याला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटले तरी केवळ ३२ घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे अद्यापही ३७३ घरे अपूर्ण असल्याचे पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीवरुन उघड झाले आहे.परभणी तालुक्यामध्ये १३१ गावांचा समावेश आहे. या गावातील काही नागरिकांना आजही आपल्या हक्काचे पक्के घर नाही. त्यामुळे या नागरिकांना किरायाच्या घरात किंवा इतर पर्यायी व्यवस्था करुन आपला निवारा करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक पंचायत समितीला एका-एका वर्षासाठी उद्दिष्टही देण्यात आले. देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण व्हावे, असे आदेशही देण्यात आले. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे परभणी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेला खो मिळाल्याचे दिसून येत आहे. परभणी तालुक्यासाठी २०१५-१६ या आर्थिक वर्षात पंचायत समितीकडे ६३१ प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दाखल झाले होते. त्यापैकी पंचायत समितीला ४०५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. पंचायत समितीने परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या ३९८ घरांना मंजुरी दिली. मंजुरी मिळालेले घरकुल वेळेत पूर्ण होईल, अशी संबंधित लाभार्थ्यांना आशा होती. मात्र प्रशासकीय अडथळे निर्माण झाल्याने ३९८ पैकी केवळ ३९१ लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता देण्यात आला आहे. तसेच २७४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळालेला आहे. विशेष म्हणजे २७४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळणे आवश्यक होते. मात्र रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदकामासाठी असलेले १८ हजार रुपये केवळ ९ लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पंचायत समितीनेही फक्त ९ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता दिलेला आहे. पंचायत समिती अंतर्गत मिळालेल्या ४०५ उद्दिष्टांपैकी केवळ ३२ घरे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मुदत संपूनही घरकुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेला प्रशासकीय पातळीवरुन खो मिळाल्याचे परभणी तालुक्यात दिसून येत आहे.