शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बससेवेच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी रोखल्या बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:43 IST

येथे मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही त्यास दाद मिळत नसल्याने २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत संतप्त झालेल्या धर्मापुरी येथील विद्यार्थिनींनी परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल १५ बस या विद्यार्थिनींनी रोखून धरल्याने एक तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथे मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी वारंवार केल्यानंतरही त्यास दाद मिळत नसल्याने २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत संतप्त झालेल्या धर्मापुरी येथील विद्यार्थिनींनी परभणी- जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल १५ बस या विद्यार्थिनींनी रोखून धरल्याने एक तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.तालुक्यातील धमार्पुरी या गावातील सुमारे १०० विद्यार्थिनी शिक्षणासाठी दररोज परभणी येथे येतात. मागील वर्षी या गावात मानव विकासची बस दररोज येत होती. त्यामुळे विद्यार्थिनीच्या शिक्षणात कोणताही अडथळा आला नाही. मात्र चालू शैक्षणिक वर्षात मानव विकासची बससेवा बंद करण्यात आली. मानव विकास अंतर्गत बससेवा तत्काळ सुरू करावी व विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी एस. टी. महामंडळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी केली. मात्र गावात कोणतीही बस थांबत नसल्याने विद्यार्थिनी संतप्त झाल्या. २० आॅगस्ट रोजी सकाळी ७ ते ८ यावेळेत धमार्पुरी फाट्यावर मुख्य मार्गावरील बस रोखून धरल्या.एक तासाच्या आंदोलनात १५ बसेस रोखरुन धरण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकºयांची समजूत काढली. जिल्हाधिकारी व एस.टी. महामंडळ प्राशासनाला आज आणखी एकदा निवेदन देऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे पोलीस कर्मचाºयांनी सांगितल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी चेअरमन नितीन कदम, मावळा संघटनेचे गोविंद कदम, तानाजी कदम, रमेश कदम यांच्यासह विद्यार्थिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थिनींचे होत आहे शैक्षणिक नुकसान४धर्मापुरी येथून परभणी येथे शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थिनींना सकाळी ७.१५ वाजता गावातून निघावे लागते. त्यानंतर बसची वाट पहात ताटकळत थांबावे लागते.४त्यामुळे पहिल्या २ तासिका बुडतात. दररोज हा प्रकार होत असल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४केवळ बससेवा नसल्याने विद्यार्थिनींच्या तासिका बुडत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीStudentविद्यार्थीagitationआंदोलन