शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
2
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
3
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
4
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
5
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
6
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
7
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
8
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
9
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
10
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
11
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
12
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
13
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
14
'भाजपा उपऱ्यांचा पक्ष बनलाय; आता रेशिमबाग नाही तर अदानी-अंबानी भाजपा चालवणार', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 
15
चीनमध्ये सापडला २२०० वर्षापूर्वीचा जुना नॅशनल हायवे; डोंगर फोडून बनवला होता चार पदरी रस्ता
16
नवऱ्याचे तुकडे करणारी मुस्कान झाली आई; जेलमध्ये साहिलचा जल्लोष, कैद्यांना म्हणाला, 'तुम्ही काका झालात'
17
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
18
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
19
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
20
भाजपचा दिग्गजांना दे धक्का, भाजपकडून ४० टक्के नवे चेहरे! तिकीट न मिळाल्याने अनेकांची नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : संघर्ष समितीचा पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:29 IST

लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. यामुळे तालुक्यात पाणीपातळी खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुधना प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना तालुक्यासाठी पाणी आवर्तन सोडले जात नाही. यामुळे तालुक्यातील गोगलगाव, सावंगी मगर, इरळद, मंगरुळ, नरळद, टाकळी नीलवर्ण, कोथाळा, राजुरा, शेवडी जहांगीर व पार्डी या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दुधना काठावरील या ११ गावातील ग्रामस्थांनी बैलगाडीसह मानवतरोड येथे रास्तारोको केला. ११.३० ते १२.१५ या वेळेत हे आंदोलन सुरु होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माजी मंत्री सुरेश वरपूडकर, लिंबाजी कचरे, अशोक बुरखुंडे, बाळासाहेब आळणे, दीपक लिपने यांची भाषणे झाली. संघर्ष समितीचे बाळासाहेब आळणे, लिंबाजी कचरे, भगवान मुळे, संजय देशमुख, अण्णासाहेब मगर, दत्तराव मगर, सुभाष देशमुख, रामराजे महाडिक, रमेश कदम, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशोर कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकुल वांघुडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर, शिवशंकर मन्नाळे, नागनाथ कुकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आंदोलकांवर गुन्हे दाखलदुधना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग अडविणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे ही कारणे देऊन पोलिसांनी २२ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशन कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामराजे महाडिक, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते, शिवशंकर पाते, अण्णासाहेब मगर या आंदोलकांचा समावेश आहे. आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन