शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:51 IST

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ): दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून इरळद, सावंगी, सोन्ना, गोगलगाव, मंगरूळ, नरळद, कोठाळा, टाकळी, पार्डी, शेवडी, राजूरा या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान वाटप करावे, पीक कर्जाचे पुनर्गठण करून तात्काळ कर्जाचे वाटप करावे इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात विलास बाबर, लिंबाजी कचरे पाटील, अशोक बुरखुंडे, संजय देशमुख, रामराजे महाडिक, बाबाराव आळणे, उद्धव निर्वळ, आनंद भक्ते, मुकुंद मगर, विष्णू जाधव, बाळासाहेब भिसे, सुभाष देशमुख, धनंजय तुरे, अशोक कचरे आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकूल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.मानवत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार अशा समस्यांना ग्रामस्थ तोंड देत असताना प्रशासनाकडून मात्र उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे किसान सभेने प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी