शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बागायती पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:18 IST

जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.पाथरी तालुक्यात यावषी कमी पाऊस पडल्याने राज्य शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस गायब झाला. त्यातच उन्हाची प्रचंड तीव्रता वाढत असताना जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जमिनीत ५०० फूट बोअरवेल खोदूनही पाणी लागत नाही. उपलब्ध पाण्याचा स्त्रोतही दिवसेंदिवस आटत चालला आहे. दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत आहे. पाथरी तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्या लगत असलेल्या भागातही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात जायकवाडीच्या पाण्यावर एवढे दिवस शेतातील पिके तग धरून होती. सध्या जायकवाडीलाही पाणी पाळी सोडण्यात आली नसल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात ३० एकरवर मल्चिंग करून शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे. साधारणत: एकरी १२०० झाड असे एकूण ३६ हजार पपईची लागवड केली आहे; परंतु, सध्या पाणी स्त्रोत आटल्याने पपईची झाडे करपून जाऊ लागली आहेत.त्याच बरोबर या गावात ३५ हजार केळीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पाणी चांगले असल्याने केळीचे पीक बहरले होते; परंतु, सध्याच्या स्थितीत वाढता उन्हाचा कडाका त्याच बरोबर आटलेल्या जलस्त्रोतांमुळे केळीचे घड पाण्याअभावी मोडून पडू लागले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून वाढविलेली बागायती शेती पाण्याअभावी उद्ध्वस्त होत आहे.शेतकरी संकटात : पाणी देण्याची मागणी४पाथरी तालुक्यातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ही पिके जगविण्यासाठी असेलेले जलस्त्रोत पूर्णत: आटून गेले आहेत. त्यामुळे या पिकांना जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ एक पाणी पाळी द्यावी, अशी मागणी होत आहे.४एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे बागायती शेती करपून जात असताना दुसरीकडे मात्र राज्य शासन दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी कोणतेही पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुष्काळी अनुदान, सन्मान निधीचे अनुदान अद्यापही बहुतांश शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आहे.सुरुवातीला जायकवाडीच्या कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याने मागील चार महिन्यात बागायती पिकांनी तग धरला होता. आता पाणीच नसल्याने बागायती पिके करपून जात आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बागायती शेती करणारा शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे बागायती पिके वाचविण्यासाठी जायकवाडी च्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे.-एकनाथ घांडगे,शेतकरी, पाथरगव्हाण

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ