शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

परभणी : बागायती पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:18 IST

जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.पाथरी तालुक्यात यावषी कमी पाऊस पडल्याने राज्य शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस गायब झाला. त्यातच उन्हाची प्रचंड तीव्रता वाढत असताना जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जमिनीत ५०० फूट बोअरवेल खोदूनही पाणी लागत नाही. उपलब्ध पाण्याचा स्त्रोतही दिवसेंदिवस आटत चालला आहे. दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत आहे. पाथरी तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्या लगत असलेल्या भागातही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात जायकवाडीच्या पाण्यावर एवढे दिवस शेतातील पिके तग धरून होती. सध्या जायकवाडीलाही पाणी पाळी सोडण्यात आली नसल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात ३० एकरवर मल्चिंग करून शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे. साधारणत: एकरी १२०० झाड असे एकूण ३६ हजार पपईची लागवड केली आहे; परंतु, सध्या पाणी स्त्रोत आटल्याने पपईची झाडे करपून जाऊ लागली आहेत.त्याच बरोबर या गावात ३५ हजार केळीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पाणी चांगले असल्याने केळीचे पीक बहरले होते; परंतु, सध्याच्या स्थितीत वाढता उन्हाचा कडाका त्याच बरोबर आटलेल्या जलस्त्रोतांमुळे केळीचे घड पाण्याअभावी मोडून पडू लागले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून वाढविलेली बागायती शेती पाण्याअभावी उद्ध्वस्त होत आहे.शेतकरी संकटात : पाणी देण्याची मागणी४पाथरी तालुक्यातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ही पिके जगविण्यासाठी असेलेले जलस्त्रोत पूर्णत: आटून गेले आहेत. त्यामुळे या पिकांना जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ एक पाणी पाळी द्यावी, अशी मागणी होत आहे.४एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे बागायती शेती करपून जात असताना दुसरीकडे मात्र राज्य शासन दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी कोणतेही पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुष्काळी अनुदान, सन्मान निधीचे अनुदान अद्यापही बहुतांश शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आहे.सुरुवातीला जायकवाडीच्या कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याने मागील चार महिन्यात बागायती पिकांनी तग धरला होता. आता पाणीच नसल्याने बागायती पिके करपून जात आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बागायती शेती करणारा शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे बागायती पिके वाचविण्यासाठी जायकवाडी च्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे.-एकनाथ घांडगे,शेतकरी, पाथरगव्हाण

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ