शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

परभणी : बागायती पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:18 IST

जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.पाथरी तालुक्यात यावषी कमी पाऊस पडल्याने राज्य शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस गायब झाला. त्यातच उन्हाची प्रचंड तीव्रता वाढत असताना जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जमिनीत ५०० फूट बोअरवेल खोदूनही पाणी लागत नाही. उपलब्ध पाण्याचा स्त्रोतही दिवसेंदिवस आटत चालला आहे. दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत आहे. पाथरी तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्या लगत असलेल्या भागातही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात जायकवाडीच्या पाण्यावर एवढे दिवस शेतातील पिके तग धरून होती. सध्या जायकवाडीलाही पाणी पाळी सोडण्यात आली नसल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात ३० एकरवर मल्चिंग करून शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे. साधारणत: एकरी १२०० झाड असे एकूण ३६ हजार पपईची लागवड केली आहे; परंतु, सध्या पाणी स्त्रोत आटल्याने पपईची झाडे करपून जाऊ लागली आहेत.त्याच बरोबर या गावात ३५ हजार केळीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पाणी चांगले असल्याने केळीचे पीक बहरले होते; परंतु, सध्याच्या स्थितीत वाढता उन्हाचा कडाका त्याच बरोबर आटलेल्या जलस्त्रोतांमुळे केळीचे घड पाण्याअभावी मोडून पडू लागले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून वाढविलेली बागायती शेती पाण्याअभावी उद्ध्वस्त होत आहे.शेतकरी संकटात : पाणी देण्याची मागणी४पाथरी तालुक्यातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ही पिके जगविण्यासाठी असेलेले जलस्त्रोत पूर्णत: आटून गेले आहेत. त्यामुळे या पिकांना जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ एक पाणी पाळी द्यावी, अशी मागणी होत आहे.४एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे बागायती शेती करपून जात असताना दुसरीकडे मात्र राज्य शासन दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी कोणतेही पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुष्काळी अनुदान, सन्मान निधीचे अनुदान अद्यापही बहुतांश शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आहे.सुरुवातीला जायकवाडीच्या कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याने मागील चार महिन्यात बागायती पिकांनी तग धरला होता. आता पाणीच नसल्याने बागायती पिके करपून जात आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बागायती शेती करणारा शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे बागायती पिके वाचविण्यासाठी जायकवाडी च्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे.-एकनाथ घांडगे,शेतकरी, पाथरगव्हाण

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ