शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

परभणी : शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळाला ३३४१ रुपयांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:52 AM

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात १५ आॅक्टोबरपासून सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली आहे़ १६ नोव्हेंबर रोजी सोयाबीनला जाहीर लिलावामध्ये ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ विशेष म्हणजे, राज्य शासनाने ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिंतूर तालुक्यातील बोरी व परिसरातील शेतकºयांना नैसर्गीक संकटांचा सामना करावा लागत आहे़ खरीप व रबी हंगामात पेरणी केलेल्या पिकातून शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडत आहेत़ दरवर्षी खरीप व रबी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांची दारे ठोठवावी लागत आहेत़ उसणवारीवर पैसे उपलब्ध करून खरीप व रबी हंगामातील पेरणी केली जाते़ त्यातून उत्पादित झालेला शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला अपेक्षित भाव दिला जात नाही़ त्यामुळे शेतकºयांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन कोलमडते, हा आजपर्यंतचा अनुभव आहे़यावर्षी जून व जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला़ या पावसाने आॅगस्ट महिन्यात सोयाबीन, कापूस ही खरीप हंगामातील पिके चांगली बहरली़ परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या तीन महिन्यांत पाऊसच झाला नाही़ त्यामुळे सोयाबीन व कापूस पिके जागेवरच करपून गेली़ ज्या शेतकºयांकडे उपलब्ध पाणी साठा आहे़ त्या शेतकºयांनी सोयाबीन जोपासले़ बोरी व परिसरातील शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी बोरी बाजार समितीच्या मार्केट यार्डात आणावा, यासाठी बाजार समितीने १५ आॅक्टोबरपासून जाहीर लिलावाद्वारे सोयाबीन खरेदी सुरू केली़राज्य व केंद्र शासनाने जाहीर केलेला ३ हजार ३९९ रुपयांचा हमीभाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती़ परंतु, व्यापाºयांकडून हमीभावाला फाटा देत अडीच ते तीन हजार रुपयांप्रमाणे शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी केली़; परंतु, १६ नोव्हेंबर रोजी बोरी येथील बाजार समितीमध्ये शेतकºयांच्या सोयाबीनला ३ हजार ३४१ रुपयांचा भाव मिळाला़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़३० हजार क्विंटल सोयाबीन खरेदीजिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून बोरी बाजार समितीकडे पाहिले जाते़ १५ आॅक्टोबरपासून या बाजार समितीत जाहीर लिलावाद्वारे सोयाबीनच्या खरेदीस सुरुवात झाली़ दिवाळी सणाला शेतकºयांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी जास्तीत जास्त व्यापाºयांकडून शेतकºयांचा शेतमाल खरेदीस सुरुवात झाली़ १६ नोव्हेंबरपर्यंत या बाजार समितीत बोरी व परिसरातील शेतकºयांकडून ३० हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे, जिंतूर येथे राज्य शासनाने शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यासाठीची प्रक्रिया सुरू असली तरी बोरी बाजार समितीत हमीभावाबरोबर भाव मिळत असल्याने शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीकडे पाठ फिरवून खाजगी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्री करण्यासाठी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे़बाजार समितीतील व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न बाजार समितीकडून करण्यात येत आहे़ सोयाबीन बरोबरच कापसालाही सर्वोच्च भाव देण्याचा विचार व्यापारी व बाजार समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे़ त्यामुळे शेतकºयांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणावा़-चंद्रकांत चौधरी,मुख्य प्रशासक बाजार समिती, बोरी

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी