शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

परभणी : ई-मस्टरअभावी रेशीम लागवड आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:07 IST

येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जिल्हा पातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेला जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. मात्र परभणी येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयातील रेशीम अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार ंिहंगोली येथील जिल्हा रेशीम अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र हे अधिकारी नियमित परभणी येथे येत नसल्याने मजुरांचे पेमेंट रखडले आहे. जिल्ह्यात तुती लागवड योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरही प्रशासकीय उदासिनता शेतकºयांच्या पथ्यावर पडत आहे. जिल्हाभरातील शेतकºयांचे ई- मस्टर रखडल्याने योजनेची कामे ठप्प पडत आहेत.दरम्यान, मंगळवारी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकºयांनी थेट जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय गाठून संंबंधितांना मस्टरे काढण्याची विनंती केली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याने शेतकºयांना आल्या पावली परतावे लागले. या शेतकºयांनी रेशीम अधिकाºयांच्या नावे पत्र दिले असून वेळेत ई-मस्टरची कामे झाली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कोल्हावाडी येथील ३० लाभार्थ्यांना तुती लागवडीसाठी तहसील कार्यालयातून कार्यारंभ आदेश प्राप्त झाले. त्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जिओ टॅगिंग आणि पंचनामेही करण्यात आले. मनरेगाच्या या योजनेंतर्गत शेतकºयांना तीन वर्षांसाठी कुशल आणि अकुशल पेमेंट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात शेतकºयांनी मजुरांमार्फत तुती लागवड केली. या मजुरांचे ई- मस्टर आणि नमुना नं.४ दाखल करण्यात आले; परंतु, मजुरांचे पेमेंट रखडले आहे. गेल्या दहा दिवसांपासून रेशीम अधिकारी कार्यालयामार्फत मजुरांच्या पेमेंटसाठी शिफारसपत्र पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे मजुरांचे पेमेंट रखडले आहे. परिणामी मजुरांच्या पेमेंटचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रश्न मार्गी लावा -बंडू जाधवरेशीम उत्पादक शेतकºयांचा प्रश्न खा.बंडू जाधव यांनी उचलून धरला असून जिल्हाधिकाºयांना याबाबत पत्र पाठवून शेतकºयांच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड केलेल्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशीम अधिकारी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने मस्टर पेमेंट तसेच इतर कामे रखडली आहेत. या ठिकाणी रेशीम अधिकाºयांसह तांत्रिक सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन मस्टर पेमेंट व इतर रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी खा.जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी