शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

परभणी : ई-मस्टरअभावी रेशीम लागवड आली धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:07 IST

येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयास पूर्णवेळ रेशीम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील ई-मस्टरची कामे ठप्प पडली आहेत. परिणामी मजुरांचे पगार रखडले असून रेशीम लागवड योजना अडचणीत सापडली आहे.शेतकऱ्यांना रेशीम लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने जिल्हा पातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या योजनेला जिल्ह्यातील शेतकºयांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. मात्र परभणी येथील जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालयातील रेशीम अधिकाºयांचे पद रिक्त असल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार ंिहंगोली येथील जिल्हा रेशीम अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र हे अधिकारी नियमित परभणी येथे येत नसल्याने मजुरांचे पेमेंट रखडले आहे. जिल्ह्यात तुती लागवड योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतरही प्रशासकीय उदासिनता शेतकºयांच्या पथ्यावर पडत आहे. जिल्हाभरातील शेतकºयांचे ई- मस्टर रखडल्याने योजनेची कामे ठप्प पडत आहेत.दरम्यान, मंगळवारी मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील शेतकºयांनी थेट जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय गाठून संंबंधितांना मस्टरे काढण्याची विनंती केली. मात्र अधिकारीच उपस्थित नसल्याने शेतकºयांना आल्या पावली परतावे लागले. या शेतकºयांनी रेशीम अधिकाºयांच्या नावे पत्र दिले असून वेळेत ई-मस्टरची कामे झाली नाहीत तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. कोल्हावाडी येथील ३० लाभार्थ्यांना तुती लागवडीसाठी तहसील कार्यालयातून कार्यारंभ आदेश प्राप्त झाले. त्यानंतर लाभार्थ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जिओ टॅगिंग आणि पंचनामेही करण्यात आले. मनरेगाच्या या योजनेंतर्गत शेतकºयांना तीन वर्षांसाठी कुशल आणि अकुशल पेमेंट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जुलै महिन्यात शेतकºयांनी मजुरांमार्फत तुती लागवड केली. या मजुरांचे ई- मस्टर आणि नमुना नं.४ दाखल करण्यात आले; परंतु, मजुरांचे पेमेंट रखडले आहे. गेल्या दहा दिवसांपासून रेशीम अधिकारी कार्यालयामार्फत मजुरांच्या पेमेंटसाठी शिफारसपत्र पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे मजुरांचे पेमेंट रखडले आहे. परिणामी मजुरांच्या पेमेंटचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रश्न मार्गी लावा -बंडू जाधवरेशीम उत्पादक शेतकºयांचा प्रश्न खा.बंडू जाधव यांनी उचलून धरला असून जिल्हाधिकाºयांना याबाबत पत्र पाठवून शेतकºयांच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. मनरेगा योजनेंतर्गत तुती लागवड केलेल्या शेतकºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेशीम अधिकारी कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव असल्याने मस्टर पेमेंट तसेच इतर कामे रखडली आहेत. या ठिकाणी रेशीम अधिकाºयांसह तांत्रिक सहाय्यकांची पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन मस्टर पेमेंट व इतर रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशी मागणी खा.जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी