शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

परभणी: सेलूला दररोज हवे २६ लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:54 IST

शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.सेलू शहराला निम्न दुधनाप्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. काही वर्षापूर्वी २५ वर्षाचे पाणी नियोजन करण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, शहरातील अंतर्गत पाईप लाईन तसेच प्रकल्पाजवळ पंप हाऊस व एक्स्प्रेस फिडर आणि पाणी उपसा करण्यासाठी देवला परिसरात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या. त्याद्वारे पंपहाऊसमध्ये पाणी आणून शहरातील ६ जलकुंभांत सोडले जाते. नगरपालिकेने शहराच्या विविध भागांत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ६ झोन तयार करून २ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात ३५०० नळ कनेक्शन आहेत. बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.निम्न दुधना प्रकल्पातील पाणी पातळी कमी होत असल्याने पालिकेने एक महिन्यापासून पाणी सोडण्याची वेळ कमी केली आहे. सध्या काही भागात १ तास तर काही परिसरात १० मिनिटे कमी असे नियोजन केले असून सध्या तरी शहराला पाणीटंचाई जाणवत नाही.दुधना : प्रकल्पाने तारले४यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसेच प्रकल्पाच्या बॅकवाटरमधून पिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आणि प्रकल्प मृत साठ्यात गेला. तरीही सेलू शहराला जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. कारण यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित केला आहे.न.प.च्या पाण्यावर मदारअत्यल्प पावसामुळे शहरातील पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हातपंप व विधंन विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. आगामी काळात आणखी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या पाण्यावरच शहर वासियाची मदार राहणार आहे.शहरातील नवीन वस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे काही भागात लवकर पालिकेने जलवाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे. जलवाहिनीचे काम लवकरच करण्यात येईल. सद्य स्थितीत १५ इंटेकवेल पैकी ५ वेल पाण्याखाली आहेत. जून महिन्यापर्यंत शहराला पाणी टंचाई भासू देणार नाही.-देविदास जाधव, मुख्याधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई