शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: सेलूला दररोज हवे २६ लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:54 IST

शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.सेलू शहराला निम्न दुधनाप्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. काही वर्षापूर्वी २५ वर्षाचे पाणी नियोजन करण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, शहरातील अंतर्गत पाईप लाईन तसेच प्रकल्पाजवळ पंप हाऊस व एक्स्प्रेस फिडर आणि पाणी उपसा करण्यासाठी देवला परिसरात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या. त्याद्वारे पंपहाऊसमध्ये पाणी आणून शहरातील ६ जलकुंभांत सोडले जाते. नगरपालिकेने शहराच्या विविध भागांत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ६ झोन तयार करून २ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात ३५०० नळ कनेक्शन आहेत. बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.निम्न दुधना प्रकल्पातील पाणी पातळी कमी होत असल्याने पालिकेने एक महिन्यापासून पाणी सोडण्याची वेळ कमी केली आहे. सध्या काही भागात १ तास तर काही परिसरात १० मिनिटे कमी असे नियोजन केले असून सध्या तरी शहराला पाणीटंचाई जाणवत नाही.दुधना : प्रकल्पाने तारले४यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसेच प्रकल्पाच्या बॅकवाटरमधून पिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आणि प्रकल्प मृत साठ्यात गेला. तरीही सेलू शहराला जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. कारण यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित केला आहे.न.प.च्या पाण्यावर मदारअत्यल्प पावसामुळे शहरातील पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हातपंप व विधंन विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. आगामी काळात आणखी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या पाण्यावरच शहर वासियाची मदार राहणार आहे.शहरातील नवीन वस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे काही भागात लवकर पालिकेने जलवाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे. जलवाहिनीचे काम लवकरच करण्यात येईल. सद्य स्थितीत १५ इंटेकवेल पैकी ५ वेल पाण्याखाली आहेत. जून महिन्यापर्यंत शहराला पाणी टंचाई भासू देणार नाही.-देविदास जाधव, मुख्याधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई