शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

परभणी: सेलूला दररोज हवे २६ लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:54 IST

शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.सेलू शहराला निम्न दुधनाप्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. काही वर्षापूर्वी २५ वर्षाचे पाणी नियोजन करण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, शहरातील अंतर्गत पाईप लाईन तसेच प्रकल्पाजवळ पंप हाऊस व एक्स्प्रेस फिडर आणि पाणी उपसा करण्यासाठी देवला परिसरात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या. त्याद्वारे पंपहाऊसमध्ये पाणी आणून शहरातील ६ जलकुंभांत सोडले जाते. नगरपालिकेने शहराच्या विविध भागांत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ६ झोन तयार करून २ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात ३५०० नळ कनेक्शन आहेत. बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.निम्न दुधना प्रकल्पातील पाणी पातळी कमी होत असल्याने पालिकेने एक महिन्यापासून पाणी सोडण्याची वेळ कमी केली आहे. सध्या काही भागात १ तास तर काही परिसरात १० मिनिटे कमी असे नियोजन केले असून सध्या तरी शहराला पाणीटंचाई जाणवत नाही.दुधना : प्रकल्पाने तारले४यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसेच प्रकल्पाच्या बॅकवाटरमधून पिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आणि प्रकल्प मृत साठ्यात गेला. तरीही सेलू शहराला जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. कारण यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित केला आहे.न.प.च्या पाण्यावर मदारअत्यल्प पावसामुळे शहरातील पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हातपंप व विधंन विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. आगामी काळात आणखी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या पाण्यावरच शहर वासियाची मदार राहणार आहे.शहरातील नवीन वस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे काही भागात लवकर पालिकेने जलवाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे. जलवाहिनीचे काम लवकरच करण्यात येईल. सद्य स्थितीत १५ इंटेकवेल पैकी ५ वेल पाण्याखाली आहेत. जून महिन्यापर्यंत शहराला पाणी टंचाई भासू देणार नाही.-देविदास जाधव, मुख्याधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई