शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

परभणी: सेलूला दररोज हवे २६ लाख लिटर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:54 IST

शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): शहराचा चारही बाजूने वाढलेला विस्तार आणि नागरिकांना लागणाऱ्या पाण्याची आवश्यकता पाहता पाणीपुरवठ्यासाठी दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज भासत आहे. हे पाणी निम्न दुधना प्रकल्पातून घेतले जात असल्याने सध्या तरी सेलू शहराला दुधनाने तारल्याचे दिसून येत आहे.सेलू शहराला निम्न दुधनाप्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. काही वर्षापूर्वी २५ वर्षाचे पाणी नियोजन करण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यातून जलशुद्धीकरण केंद्र, नवीन जलकुंभ, शहरातील अंतर्गत पाईप लाईन तसेच प्रकल्पाजवळ पंप हाऊस व एक्स्प्रेस फिडर आणि पाणी उपसा करण्यासाठी देवला परिसरात १५ इंटेकवेल घेण्यात आल्या. त्याद्वारे पंपहाऊसमध्ये पाणी आणून शहरातील ६ जलकुंभांत सोडले जाते. नगरपालिकेने शहराच्या विविध भागांत सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी ६ झोन तयार करून २ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात ३५०० नळ कनेक्शन आहेत. बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.निम्न दुधना प्रकल्पातील पाणी पातळी कमी होत असल्याने पालिकेने एक महिन्यापासून पाणी सोडण्याची वेळ कमी केली आहे. सध्या काही भागात १ तास तर काही परिसरात १० मिनिटे कमी असे नियोजन केले असून सध्या तरी शहराला पाणीटंचाई जाणवत नाही.दुधना : प्रकल्पाने तारले४यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यातच रबी हंगामातील पिकांसाठी दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. तसेच प्रकल्पाच्या बॅकवाटरमधून पिकांना पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे दुधना प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आणि प्रकल्प मृत साठ्यात गेला. तरीही सेलू शहराला जूनपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. कारण यापूर्वीच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित केला आहे.न.प.च्या पाण्यावर मदारअत्यल्प पावसामुळे शहरातील पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे हातपंप व विधंन विहीरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. आगामी काळात आणखी पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या पाण्यावरच शहर वासियाची मदार राहणार आहे.शहरातील नवीन वस्त्यांमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे काही भागात लवकर पालिकेने जलवाहिनी टाकावी, अशी मागणी होत आहे. जलवाहिनीचे काम लवकरच करण्यात येईल. सद्य स्थितीत १५ इंटेकवेल पैकी ५ वेल पाण्याखाली आहेत. जून महिन्यापर्यंत शहराला पाणी टंचाई भासू देणार नाही.-देविदास जाधव, मुख्याधिकारी

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई