शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

परभणी ; शालेय पोषण आहार तपासणीपथकाचा दौरा रद्द; मुख्याध्यापक सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:24 IST

राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवस विविध प्रकारचा पोषण आहार दिला जातो. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. या महत्त्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यात व्यवस्थित होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाने ११ सदस्यांचे पथक नियुक्त केले होते. त्यामध्ये अन्न व पोषण विभागाच्या केंद्रातील प्रमुख प्रा.उमा भोयर यांची पथकप्रमुख म्हणून तर शालेय पोषण आहारच्या संचालक जी.विजया भास्कर, प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहाय्यक प्रा.स्वाती ध्रुव, युनिसेफचे प्रतिनिधी, मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार, वरिष्ठ सल्लागार दिनेश प्रधान यांची सदस्य म्हणून तर सहाय्यक संशोधक म्हणून डॉ.श्रूती कांटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल, मयुरी राणा यांचा पथकात समावेश होता.३ ते १० डिसेंबर दरम्यान या पथकातील अधिकारी राज्यातील विविध शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहाराबाबतची माहिती घेणार होते. त्यानुसार या पथकाला प्रारंभी साताºयाला तपासणीसाठी जायचे होते; परंतु, या पथकाने ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची सहल केली. त्यानंतर दुपारी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर या पथकाने मराठवाड्यातील शाळांची तपासणी करणे आवश्यक होते; परंतु, तपासणी न करताच हे पथक निघून गेले. १० डिसेंबरपर्यंत पथकाचा दौरा असल्याने सोमवारपर्यंत पथक जिल्ह्यात तपासणीसाठी येईल, याची विविध शाळांमधील काही मुख्याध्यापकांना धास्ती होती; परंतु, या पथकाने परभणी जिल्ह्यात न येताच आपला दौरा गुंडाळला. त्यामुळे विविध शाळांमधील मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.या बाबींची केली होती तयारी४शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणीबाबची पाहणी करण्यासाठी येणाºया पथकाची सर्व शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने उपलब्ध असलेली कागदपत्रे तयार करुन ठेवण्यात आली होती. स्वयंपाकगृहाची साफसफाई करण्यात आली होती. तसेच स्टॉक रजिस्टर, धान्यादिमाल उपलब्ध करुन ठेवण्यात आला होता. तसेच वैद्यकीय दाखला, नोंदणी पत्रक, मेनू प्रमाणे आहार देण्याची माहिती (प्रत्यक्ष फक्त पिवळा भात दिला जातो), हॅण्डवॉश, साबण विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी, टॉवेल, आसनपट्ट्या आदी बाबतची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध मुख्याध्यापकांनी तशी तयारी केली होती; परंतु, पथकाचा दौराच रद्द झाल्याने मुख्याध्यापकांची या बाबीतून सुटका झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी