शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

परभणी ; शालेय पोषण आहार तपासणीपथकाचा दौरा रद्द; मुख्याध्यापक सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:24 IST

राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवस विविध प्रकारचा पोषण आहार दिला जातो. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. या महत्त्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यात व्यवस्थित होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाने ११ सदस्यांचे पथक नियुक्त केले होते. त्यामध्ये अन्न व पोषण विभागाच्या केंद्रातील प्रमुख प्रा.उमा भोयर यांची पथकप्रमुख म्हणून तर शालेय पोषण आहारच्या संचालक जी.विजया भास्कर, प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहाय्यक प्रा.स्वाती ध्रुव, युनिसेफचे प्रतिनिधी, मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार, वरिष्ठ सल्लागार दिनेश प्रधान यांची सदस्य म्हणून तर सहाय्यक संशोधक म्हणून डॉ.श्रूती कांटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल, मयुरी राणा यांचा पथकात समावेश होता.३ ते १० डिसेंबर दरम्यान या पथकातील अधिकारी राज्यातील विविध शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहाराबाबतची माहिती घेणार होते. त्यानुसार या पथकाला प्रारंभी साताºयाला तपासणीसाठी जायचे होते; परंतु, या पथकाने ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची सहल केली. त्यानंतर दुपारी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर या पथकाने मराठवाड्यातील शाळांची तपासणी करणे आवश्यक होते; परंतु, तपासणी न करताच हे पथक निघून गेले. १० डिसेंबरपर्यंत पथकाचा दौरा असल्याने सोमवारपर्यंत पथक जिल्ह्यात तपासणीसाठी येईल, याची विविध शाळांमधील काही मुख्याध्यापकांना धास्ती होती; परंतु, या पथकाने परभणी जिल्ह्यात न येताच आपला दौरा गुंडाळला. त्यामुळे विविध शाळांमधील मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.या बाबींची केली होती तयारी४शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणीबाबची पाहणी करण्यासाठी येणाºया पथकाची सर्व शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने उपलब्ध असलेली कागदपत्रे तयार करुन ठेवण्यात आली होती. स्वयंपाकगृहाची साफसफाई करण्यात आली होती. तसेच स्टॉक रजिस्टर, धान्यादिमाल उपलब्ध करुन ठेवण्यात आला होता. तसेच वैद्यकीय दाखला, नोंदणी पत्रक, मेनू प्रमाणे आहार देण्याची माहिती (प्रत्यक्ष फक्त पिवळा भात दिला जातो), हॅण्डवॉश, साबण विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी, टॉवेल, आसनपट्ट्या आदी बाबतची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध मुख्याध्यापकांनी तशी तयारी केली होती; परंतु, पथकाचा दौराच रद्द झाल्याने मुख्याध्यापकांची या बाबीतून सुटका झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी