शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मंजुरीअभावी रखडली टंचाई निवारणाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:13 IST

शहरात निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात या कृती आराखड्याला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात निर्माण झालेली टंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना आखल्या असल्या तरी प्रत्यक्षात या कृती आराखड्याला विभागीय आयुक्तांकडून मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाची कामे ठप्प पडली आहेत.परभणी शहरामध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. राहटी येथील बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही योजना ३० वर्षांपूर्वीची जुनी असल्याने शहरवासियांना मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. महापालिका प्रशासनाने अशाही परिस्थितीत पाणीपुरवठा सुरु ठेवला आहे. शहरातील अनेक भागात जलवाहिनी पोहचली नसल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. नळ योजनेद्वारे १४ दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सार्वजनिक हातपंप, विहिरींचे पाणी खालावले आहे. तर नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ज्या येलदरी धरणात पाण्याचे आरक्षण केले आहे. त्या धरणातही पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसाठी पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र झाले आहे. सध्या शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे; परंतु, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या कृती आरखड्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने टंचाई निवारणाच्या कामांना निधीच्या दुष्काळाचा फटका बसत आहे.परभणी महापालिकेने विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार १६ आॅक्टोबर रोजी शहरात टंचाई निवारणाच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर ४ कोटी ४२ लाख ५९ हजार रुपयांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. सहा महिन्यांपासून हा आराखडा वरिष्ठ पातळीवर सादर केला असला तरी अद्याप आराखड्यातील एकाही कामास मंजुरी मिळाली नाही. या कामांना फेब्रुवारी महिन्यात मंजुरी मिळाली असती तर आतापर्यंत कामे पूर्ण होऊन नागरिकांना टंचाईपासून दिलासा मिळाला असता. मात्र निधीच उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे सद्यस्थितीला ठप्प पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. मनपाकडून टंचाई कृती आराखड्याच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला जात आहे. मात्र निधी मिळत नसल्याने कामे ठप्प आहेत.२७ टँकर सुरु४कृती आराखड्यातील प्रस्तावांना मंजुरी मिळाली नसली तरी शहरात प्रत्यक्षात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असल्याने मनपाने २७ टँकर सुरु केले असून याद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा निधी वरिष्ठस्तरावरुन प्राप्त झाला नाही तर महापालिकेला स्वत:च्या उत्पन्नातून हा निधी खर्च करावा लागणार आहे.असे केले होते नियोजनशहरात निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने आॅक्टोबर महिन्यातच नियोजन केले आहे. त्यामध्ये शहरातील १० विहिरींचे खोलीकरण करुन त्यातील गाळ काढणे, या विहिरींना सुरक्षा जाळी बसविण्याच्या कामासाठी २३ लाख ७६ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात १०० मीटरपर्यंत एचडीपीई जलवाहिनी टाकण्यासाठी ५३ लाख ८१ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये १२ हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर आणि ६ हजार लिटर क्षमतेचे ३५ टँकर लावून फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात शहरवासियांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. तसेच शहरातील २३३ विंधन विहिरींच्या दुरुस्तीसाठी ३८ लाख ४६ हजार रुपये आणि प्रत्येक प्रभागात चार या प्रमाणे १६ प्रभागांमध्ये नवीन विंधन विहीर घेऊन त्यावर सबमर्सिबल पंप बसविण्यासाठी ५४ लाख ५६ हजार रुपये प्रस्तावित केले आहेत. हा कृती आराखडा वरिष्ठ स्तरावर पाठवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. आणखी तीन महिने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागणार आहे; परंतु, अद्यापही कृती आराखड्याला मंजुरी मिळाली नसल्याने कामे ठप्प आहेत.दोन वर्षापासून मिळेना निधी४पाणीटंचाईच्या उपाययोजनांना शासनाकडून प्राधान्य दिले जात असले तरी महापालिकेच्या बाबतीत मात्र शासन दुजाभाव करीत असल्याची भावना निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून मनपा टंचाई कृती आराखड्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवित आहे. मात्र या प्रस्तावांना मंजुरी दिली जात नाही. सलग तिसºया वर्षी कृती आराखड्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे; परंतु, मागील दोन वर्षांच्या अनुभवाची पुनरावृत्ती होते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई