शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

परभणी : अभियंत्यांअभावी रखडला कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:19 IST

येथील पाणीपुरवठा विभागामध्ये अभियंतेच उपलब्ध नसल्याने सिंचन विहिरींच्या तांत्रिक मान्यता रखडल्या असून ऐन दुष्काळात जनतेची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): येथील पाणीपुरवठा विभागामध्ये अभियंतेच उपलब्ध नसल्याने सिंचन विहिरींच्या तांत्रिक मान्यता रखडल्या असून ऐन दुष्काळात जनतेची कामे ठप्प पडली आहेत.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी वाय.आय. खान हे ३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. तेव्हापासून हा विभाग बेवारस बनला आहे. सिंचन विहिरींना तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार शाखा अभियंत्यांना नाहीत. परिणामी टंचाईच्या काळात ७१ सिंचन विहिरींचे प्रस्ताव दोन महिन्यांपासून रखडले आहेत. शिवाय टंचाईतील कामेही अधिकारी करीत नसल्याने बंद आहेत. लघू सिंचन विभागातही अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी ४ अभियंते असून एक महिन्यापासून एकही अभियंता कार्यालयात फिरकला नाही. गावागावामध्ये सिंचन विहीर व पाझर तलावावर अनाधिकृतपणे सुरू असलेल्या मोटारी काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही कारवाई मात्र होत नाही. प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकाºयांच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील चित्र अलबेल आहे. या विभागातील अभियंते बहुतांश वेळा उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागात घरकूल व इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांचे मोजमाप घेण्यासाठी परभणी व इतर ठिकाणी अभियंत्यांच्या निवासस्थानी जाऊन मोजमाप आणावे लागते. लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात शाखा अभियंता अंबेकर वगळता एकही अभियंता कार्यालयाकडे फिरकत नाही. विशेष म्हणजे अनेक अभियंत्यांची कामे खाजगी व्यक्तीच करीत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. उपविभागीय पाणीपुरवठा विभागातही अभियंते उपलब्ध नसतात. नव्याने आलेले शाखा अभियंता बालाजी पाटील व शेषराव घुगे यांच्यावरच कार्यालयाची मदार आहे. कार्यालयातील अनेक कामे कंत्राटी अभियंतेच पाहत असल्याचे दिसून आले. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघू सिंचन विभाग, बांधकाम विभाग आणि पंचायत समिती विभागात एकूण २० अभियंते आहेत;परंतु, केवळ दोन ते तीन अभियंतेच नियमित कार्यालयात उपस्थित राहतात. परिणामी शासकीय कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र जिंतूर तालुक्यात दिसत आहे.दौºयाचे दिले जाते कारण४तालुक्यातील लघू सिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग, पंचायत समितीमधील बांधकाम विभाग या विभागातील अभियंते बहुतांश वेळा कार्यालयात उपस्थित नसतात. तेथील अधिकाºयांकडे विचारणा केल्यानंतर अभियंते दौºयावर गेले आहेत, असे ठराविक उत्तर दिले जात आहे.पदभार घेण्यास अधिकारी उदासिन४ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत मनरेगाच्या सिंचन विहिरी व टंचाईची कामे प्रलंबित आहेत; परंतु, या विभागात पदभार घेण्यासाठी अधिकारी पुढे येत नाहीत.४परिणामी तालुक्यातील कामे दुष्काळी परिस्थितीतही रखडली आहेत. प्रशासनाने तातडीन पावले उचलून अभियंत्याचा पदभार इतर अधिकाºयांकडे द्यावा व खोळंबलेली कामे मार्गी लावावेत, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांतून केली जात आहे.कार्यविवरण वह्या गायबविविध विभागातील अभियंत्यांनी दररोज कार्यालयात येऊन दौरा रजिस्टरवर स्वाक्षरी करणे व दररोजच्या कामाची नोंद कार्यविवरण रजिस्टरमध्ये करणे गरजेचे आहे; परंतु, एकाही कार्यालयात हे कार्यविवरण रजिस्टर पहावयास मिळत नाही. त्यामुळे अभियंत्यांचे फावत आहे.आठवड्यातून दोन दिवस अभियंते जिंतूरला येतात. त्यांनी दररोज जिंतूर येथे येऊन दौरा रजिस्टरला नोंद करणे आवश्यक आहे. मात्र असे होत नाही.अब्दुल शेख,प्रभारी गटविकास अधिकारी, जिंतूर

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळ