शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : जांबवासियांनी केला निर्धार; गाव बनविणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:48 IST

सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.मागील अनेक वर्षापासून जांब बु. या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिंतूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ सहभाग न नोंदविता गावातील आबाल-वृद्धांनी या चळवळीत श्रमदान केले. गावामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सीसीटी, अर्दन स्ट्रक्चर यासह जलसंधारणाची अनेक कामे श्रमदानातून पूर्ण केली.ग्रामस्थांच्या श्रमदानाला सलाम करीत तालुक्यातील अनेक नागरिकांनी, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांनी प्रतिसाद दिला. यामध्ये कर्मचारीवर्ग, विविध सामाजिक संस्था, व्यापारी यांनीही खारीचा वाटा उचलला. सर्वात महत्त्वाचे या श्रमदानासाठी लागणारी जेसीबी मशीन अनुलोम या सामाजिक संघटनेने जांबवासियांना उपलब्ध करून दिली. या जेबीसी मशीनसाठी लागणाºया डिझेलसाठी प्रशासन व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत केली.विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील जांब बु. या गावाने पाणी फाऊंडेशन उपक्रमांतर्गत येणाºया सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये गतवर्षी या स्पर्धेेत हे गाव जिल्ह्यात प्रथम आले. एवढ्यावरच हे ग्रामस्थ न थांबता यावर्षीही त्यांनी जलसंधारणाची कामे सुरूच ठेवली आहेत. या गावामध्ये झालेली जलसंधारणाची कामे पंचक्रोशीसह जिल्ह्यात आदर्श निर्माण करणारी ठरत आहेत. विशेष म्हणेज या श्रमदानामध्ये गावातील नवयुवक पुढे सरसावले असून त्यांना ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळत आहे. सामाजिक संस्थांची मदत व प्रशासनाचा हातभार यावर हे गाव लवकरच जिल्ह्यामध्ये जल बँक तयार करणारे गाव म्हणूून विकसित होताना दिसून येत आहे.पहिल्याच पावसात साचले पाणीसततच्या निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जांब बु. ग्रामस्थांनी गतवर्षीपासून पाणी फाऊंडेशन उपकेंद्रांतर्गत श्रमदान करीत गाव पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गतवर्षी व यावर्षी जलसंधारणांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसात खळखळून पाणी वाहिले. श्रमदान करुन उभारलेल्या बंधाºयामध्येही पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचे चिज झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा