शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

परभणी : जांबवासियांनी केला निर्धार; गाव बनविणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 22:48 IST

सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी) : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीला फाटा देत गाव एकत्र आले तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय तालुक्यातील जांब बु. येथील ग्रामस्थांनी दाखविला आहे. संपूर्ण गावामध्ये जलसंधारणाची कामे करून गाव जलसाक्षर बनविण्याचा निर्धार जांब बु. येथील ग्रामस्थांनी केला आहे.मागील अनेक वर्षापासून जांब बु. या गावामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिंतूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाऊंडेशन या उपक्रमात सहभाग घेतला. केवळ सहभाग न नोंदविता गावातील आबाल-वृद्धांनी या चळवळीत श्रमदान केले. गावामध्ये पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सीसीटी, अर्दन स्ट्रक्चर यासह जलसंधारणाची अनेक कामे श्रमदानातून पूर्ण केली.ग्रामस्थांच्या श्रमदानाला सलाम करीत तालुक्यातील अनेक नागरिकांनी, सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांनी प्रतिसाद दिला. यामध्ये कर्मचारीवर्ग, विविध सामाजिक संस्था, व्यापारी यांनीही खारीचा वाटा उचलला. सर्वात महत्त्वाचे या श्रमदानासाठी लागणारी जेसीबी मशीन अनुलोम या सामाजिक संघटनेने जांबवासियांना उपलब्ध करून दिली. या जेबीसी मशीनसाठी लागणाºया डिझेलसाठी प्रशासन व तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी मदत केली.विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील जांब बु. या गावाने पाणी फाऊंडेशन उपक्रमांतर्गत येणाºया सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये गतवर्षी या स्पर्धेेत हे गाव जिल्ह्यात प्रथम आले. एवढ्यावरच हे ग्रामस्थ न थांबता यावर्षीही त्यांनी जलसंधारणाची कामे सुरूच ठेवली आहेत. या गावामध्ये झालेली जलसंधारणाची कामे पंचक्रोशीसह जिल्ह्यात आदर्श निर्माण करणारी ठरत आहेत. विशेष म्हणेज या श्रमदानामध्ये गावातील नवयुवक पुढे सरसावले असून त्यांना ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळत आहे. सामाजिक संस्थांची मदत व प्रशासनाचा हातभार यावर हे गाव लवकरच जिल्ह्यामध्ये जल बँक तयार करणारे गाव म्हणूून विकसित होताना दिसून येत आहे.पहिल्याच पावसात साचले पाणीसततच्या निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जांब बु. ग्रामस्थांनी गतवर्षीपासून पाणी फाऊंडेशन उपकेंद्रांतर्गत श्रमदान करीत गाव पाणीदार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गतवर्षी व यावर्षी जलसंधारणांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये मान्सूनपूर्व झालेल्या पहिल्याच पावसात खळखळून पाणी वाहिले. श्रमदान करुन उभारलेल्या बंधाºयामध्येही पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानाचे चिज झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळWaterपाणीWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा