शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

परभणी : बंदीत ५५९ शिक्षकांची भरती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 00:48 IST

राज्य शासनाने २०१० नंतर बंद केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर जिल्ह्यात ५५९ शिक्षकांची परस्पर भरती झाल्याची बाब समोर आली असून ही अनियमितता समोर येऊ नये म्हणूनच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील १ जानेवारी २०१५ पूर्वीचे महत्वपूर्ण दस्तावेज गायब केले गेले असल्याची चर्चा सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने २०१० नंतर बंद केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेनंतर जिल्ह्यात ५५९ शिक्षकांची परस्पर भरती झाल्याची बाब समोर आली असून ही अनियमितता समोर येऊ नये म्हणूनच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील १ जानेवारी २०१५ पूर्वीचे महत्वपूर्ण दस्तावेज गायब केले गेले असल्याची चर्चा सुरु आहे.परभणी येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील १ जानेवारी २०१५ पूर्वीचे जिल्हाभरातील खाजगी अनुदानित, विना अनुदानित, सर्व माध्यमांच्या संच मान्यता, वैयक्तिक मान्यता, पद मान्यता, पद नियुक्ती, शालार्थ, सेवा सातत्य, वेतन व वेतनोत्तर अनुदान, वैद्यकीय बिले आदी संदर्भातील महत्त्वपूर्ण नोंदी असलेले दस्तावेज गायब असल्याची बाब जि.प. सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांनी नेमलेल्या चौकशी पथकाच्या निदर्शनास आली होती.त्यानंतर या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी, पुणे येथे शिक्षण आयुक्तांच्या तपासणीसाठी सदरील दस्तावेज पाठविण्यात आले; परंतु, ते परत कार्यालयात आले नाहीत, असे सांगून या संदर्भातील खुलासा सीईओ पृथ्वीराज यांच्यासह शिक्षण संचालक, उपसंचालक यांना १२ दिवसांपूर्वी सादर केला होता. या प्रकरणी अद्याप कसल्याही प्रकारची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली नाही. एरव्ही कर्तव्यदक्षपणाचा साक्षात्कार तातडीने कृत्यातून घडवून देणारे अधिकारी या प्रकरणात मात्र शांत का आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, या संदर्भात अधिक माहिती घेतली असता तत्कालीन शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना, २०१० नंतर शिक्षक भरती बंदी असताना परभणी जिल्ह्यात काही शिक्षण संस्थांनी शासनाच्या निर्णयाचा गैरअर्थ काढून शिक्षक भरती प्रक्रिया राबविली होती. जिल्ह्यात अशा ५५९ शिक्षकांची परस्पर भरती करण्यात आली असल्याची कुणकुण लागली होती. त्यानंतरच त्यांनी सदरील दस्तावेज तपासणीसाठी पुण्याला मागवून घेतले होते, अशी चर्चा आहे. तपासणीनंतर भापकर यांनी काय कारवाई केली, हे जसे गुलदस्त्यात आहे, तसेच पुण्याहून निघालेले दस्तावेज परभणी कार्यालयात न येता कुठे गायब झाले हे ही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे ज्या ५५९ शिक्षकांची भरती शासनाचे नियम डावलून झाली, ते सर्व शिक्षक आज शासनाचा पगार मात्र नियमितपणे घेत आहेत. शिवाय त्यांच्या अनाधिकृत नियुक्त्यांना मान्यता देणारे अधिकारीही नामनिराळे झाले आहेत.दस्तऐवज गायब करणारे कर्मचारी कोण?४माध्यमिक शिक्षण विभागातील दस्तऐवज पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात घेऊन जाणारे कर्मचारीही याच कार्यालयातील असणार हे निश्चित आहे. त्यामुळे सदरील दस्तावेज परभणी येथून पुण्याला कोणत्या कर्मचाऱ्यांनी नेले व पुण्यातून कोणत्या कर्मचाºयाने परभणीत दस्तावेज आणण्याच्या नावाखाली ते ताब्यात घेतले, याची निश्चितच नोंद शासन दरबारी असणार आहे. त्यामुळे या कर्मचाºयांचा शोध घेण्याचे काम शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाचे आहे; परंतु, नेमकी त्या दृष्टीकोनातून सध्या तरी कारवाई होताना दिसून येत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीEducationशिक्षणTeacherशिक्षक