शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

परभणी :६२ टक्के पाऊस होवूनही साठा वाढेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:09 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६२़३० टक्के पाऊस होवूनही प्रमुख तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नसल्याने भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ६२़३० टक्के पाऊस होवूनही प्रमुख तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नसल्याने भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़परभणी जिल्ह्यात सरासरी ७७४़६२ मिमी पाऊस होत असतो़ त्यानुसार यावर्षीही समाधानकारक पाऊस राहील, असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले होते़ त्यामुळे सातत्याने दुष्काळाच्या भीतीने दडपणाखाली राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल, असे वाटत होते; परंतु, पावसामध्ये सातत्याने खंड पडत असल्याने जमिनीमध्ये पाणी मुरले नाही़ परिणामी पाणीसाठ्यामध्ये वाढच होत नसल्याची स्थिती जिल्ह्यात पहावयास मिळत आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६२़३० टक्के पाऊस झाला आहे़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ८९़७० टक्के पाऊस पूर्णा तालुक्यात झाला आहे़ त्या खालोखाल सोनपेठ तालुक्यात ६२़७० टक्के, जिंतूर तालुक्यात ६२़३० टक्के, मानवत तालुक्यात ६१़८० टक्के, गंगाखेड तालुक्यात ६०़२० टक्के, परभणी तालुक्यात ५९़२० टक्के, पालम तालुक्यात ५८़४० टक्के, सेलू तालुक्यात ५६़८० टक्के आणि पाथरी तालुक्यात ५३ टक्के पाऊस झाला आहे़ पावसाची टक्केवारी पाहता जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणी असेल, असे वाटते; परंतु, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे़ पावसामध्ये सातत्य राहिले नसल्याने पडलेले पाणी जमिनीमध्ये मुरले नाही़ परिणामी पाणी पातळीत वाढ झाली नाही़ याचा जलसाठ्यावर परिणाम झाला आहे़जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात सद्यस्थितीत फक्त ९़२३ टक्के पाणीसाठा आहे़ गतवर्षी या धरणात यावेळेला १०़२१ टक्के पाणी होते़ निम्न दूधना प्रकल्पात गतवर्षी तब्बल ७०़६२ टक्के पाणीसाठा होता़ आता फक्त २४़६७ टक्के पाणीसाठा आहे़ मासोळी प्रकल्पात गतवर्षी १४ टक्के पाणी होते, आता फक्त १० टक्के पाणीसाठा आहे़ पिंपळदरी तलावात गतवर्षी २७़६५ टक्के पाणीसाठा होता़ आता फक्त ५़८९ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक आहे़ याशिवाय मानवत तालुक्यातील झरी येथील प्रकल्पात ८६ टक्के पाणीसाठा आहे़ गतवर्षी येथे १०० टक्के पाणीसाठा होता़ डिग्रस बंधाºयात सद्यस्थितीत ६७ टक्के पाणीसाठा आहे़ गतवर्षी येथे ५० टक्के पाणीसाठा होता़ तर मुदगल बंधाºयात ८० टक्के पाणीसाठा आहे़ या बंधाºयात गतवर्षी यावेळी ८६ टक्के पाणीसाठा होता़ ढालेगाव बंधाºयात सद्यस्थितीत ९६ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी येथे यावेळेला ९८ टक्के पाणीसाठा होता़पावसाची : गरजजिल्ह्यात परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही़ गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे़ या अनुषंगाने सोमवारी मध्यरात्री परभणी जिल्ह्यात सरासरी ६़२९ टक्के पाऊस झाला़ त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे २० मिमी पाऊस पालम तालुक्यात झाला़ परभणी शहरातही १०़५० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ असे असले तरी शहरातील एका भागात पाऊस होत आहे व दुसरा भाग कोरडा राहत आहे़त्यामुळे महसूलच्या पावसाची नोंद घेणाºया यंत्राच्या ठिकाणी पाऊस झाला तर त्याची महसूलकडे नोंद होते; परंतु, त्याच कार्यालयाच्या पलीकडील बाजुला पाऊसच होत नाही़ अशा वेळी महसूलकडून पावसाच्या नोंदी शासनाकडे जातात; परंतु, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी असते़ त्यामुळे जिल्ह्याला आणखी सर्वदूर व मोठ्या परतीच्या पावसाची आवश्यकता आहे़ परतीचा पाऊस चांगल्या झाल्यावरच खरीप हंगामात शेतकºयांचे झालेले नुकसान रबी हंगामात भरून निघणार आहे़ अन्यथा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद राहणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसWaterपाणी