शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

परभणी : पावसाने जिल्ह्यातील पिकांना तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:23 IST

पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने कोमेजून जात असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ही पिके तरारली असून पीक उत्पादनालाही या पावसाचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पिके वाढीच्या अवस्थेत असताना तब्बल दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी पुनरागमन केले असून शुक्रवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने कोमेजून जात असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. ही पिके तरारली असून पीक उत्पादनालाही या पावसाचा फायदा होणार आहे.यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती. दीड महिन्यापासून पावसाने ताण दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागात पिण्याचे पाण्याचे संकट गंभीर होत होते. त्याचबरोबर अल्प पावसावर लागवड केलेले खरीप हंगामातील पिके कोमेजण्याच्या अवस्थेत आले होते. सोयाबीन, कापूस या पिकांची वाढ चांगली झाली होती. सोयाबीन फुलोऱ्याच्या अवस्थेत असून कापूस पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेमध्ये पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते. वेळेत पाणी मिळाले नाही तर पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. शेतकरी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत होते.याच काळात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकाडा मोठ्या प्रमाणात वाढल्याने संपूर्ण दिवस नागरिकांनी घालमेतील घालविला. सायंकाळच्या सुमारास परभणी, गंगाखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली. हा पाऊस तुरळक स्वरुपाचा होता. मात्र रात्री ११ वाजेनंतर पावसाने पुन्हा जोर धरला. परभणी शहर परिसरात एक ते दीड तास मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यानंतर सकाळपर्यंत पावसाची रिपरिप कायम होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधुन-मधून पावसाच्या सरी होत होत्या. सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहर परिसरात हलका पाऊस झाला. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास १० ते १५ मिनिटे जोरदार पाऊस झाला.शनिवारी परभणी शहरासह गंगाखेड, मानवत, पालम, सोनपेठ, पाथरी व पूर्णा या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मानवत येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. गंगाखेड शहरातही दुपारी रिमझिम आणि सायंकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. जिंतूर तालुक्यातील येलदरी, बोरी आणि परिसरातील गावे, सेलू शहर, पूर्णा आणि परिसरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसाने कापूस, सोयाबिन या पिकांना दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरणामुळे झालेला किडीचा प्रादुर्भाव या पावसाने आटोक्यात येण्याची शक्यता आहे. एकंदर शनिवारी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकºयांच्या चिंता काही दिवसांपुरत्या का होईना; दूर झाल्या आहेत.सरासरी २१.६३ मि.मी. पाऊस४शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने शनिवारी सकाळी ८ वाजता घेतली असून २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २१.६३ मि.मी. पाऊस झाला आहे. पूर्णा तालुक्यामध्ये सर्वाधिक ३४.८० मि.मी., गंगाखेड तालुक्यात ३०.७५ मि.मी., सोनपेठ ३० मि.मी., परभणी २६.७५ मि.मी., जिंतूर २६.१७ मि.मी., सेलू १५.२० मि.मी., मानवत १४.३३ मि.मी. तर पाथरी ११ मि.मी.४पालम तालुक्यात ५.६७ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३१२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ४२१. ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. मानवत ३५७.६८, गंगाखेड तालुक्यात ३१८, सोनपेठ ३१६, जिंतूर ३०५.८४, पाथरी २८३.३१, परभणी २८२.३७, सेलू २६६.४०, पालम २६२.३२ मि.मी. पाऊस झाला आहे.सरासरीच्या ४० टक्के पाऊस४जिल्ह्यात पावसाळी हंगामामध्ये ७७४.६२ मि.मी. पाऊस होतो. या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४०.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक ५२ टक्के, सोनपेठ ४५, गंगाखेड ४५, मानवत ४३, जिंतूर, पालम तालुक्यात ३७, पाथरी ३६ आणि परभणी ३५ आणि सेलू तालुक्यात सर्वात कमी ३२ टक्के पाऊस झाला आहे.गंगाखेडच्या गोदावरी नदीपात्रात टाकला नगरपालिकेने बांध४गंगाखेड- जायकवाडी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर धारखेड ते गंगाखेड दरम्यान नगरपालिकेच्या वतीने वाळूचा भराव टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहत्या पाण्यात वाळूचा हा बांध टिकेल का, असा सवाल शहरवासियांमधून उपस्थित केला जात आहे.२४ आॅगस्ट रोजी जायकवाडीचे पाणी गोदावरी नदीपात्रात दाखल झाले. २५ आॅगस्ट रोजी सकाळी गंगाखेड शहर ते धारखेड दरम्यान नगरपालिकेने उभारलेला कच्च्या बंधाºयाला भगदाड पडून तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. नदीपात्रातून वाहून जाणारे पाणी अडवून शहरवासियांची तहान भागविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.४ त्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी गंगाखेड ते धारखेड या कच्च्या रस्त्यावर वाळूचा भराव टाकून पाणी अडविण्याचे काम हाती घेण्यात आले. मोकळ्या वाळूचा भराव टाकण्याऐवजी वाळू पोत्यात भरुन त्याचा थर लावत दगड, माती व मुरुमाचा भराव टाकावा, अशा सूचना नागरिकांकडून देण्यात आल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पालिकेने वाळूचा भराव टाकण्याचे काम सुरुच ठेवले होते. दरम्यान, या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता मयुरी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करुन वाळूने भरलेल्या पोत्याचा भराव टाकूनच नदीपात्रातील पाणी अडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी