शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

परभणी : ४३४७ क्विंटलची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:54 IST

जिल्ह्यातील ६ हमीभाव खरेदी केंद्राकडून ४ हजार ३४७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६९० क्विंटल मूग, ४९० क्विंटल सोयाबीन तर १६७ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मूग व उडीद खरेदीसाठी दिलेली २३ डिसेंबरची मुदत संपल्याने आता ५ जानेवारीपर्यंत केवळ सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्राकडून सुरु राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ६ हमीभाव खरेदी केंद्राकडून ४ हजार ३४७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ३ हजार ६९० क्विंटल मूग, ४९० क्विंटल सोयाबीन तर १६७ क्विंटल उडदाची खरेदी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मूग व उडीद खरेदीसाठी दिलेली २३ डिसेंबरची मुदत संपल्याने आता ५ जानेवारीपर्यंत केवळ सोयाबीनची हमीभाव खरेदी केंद्राकडून सुरु राहणार आहे.यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातच पावसाने दगा दिल्यामुळे पिके हाती लागली नाहीत. जो शेतीमाल शेतकऱ्यांच्या पदरात पडला त्याला किमान हमीभाव मिळावा, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली; परंतु, हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरु झाले नाही. माल विक्री करण्यासाठी शेतकºयांकडे पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे अनेक शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागली. वारंवार मागणी करुनही हमीभाव खरेदी केंद्र सुरु होत नसल्याने अनेक शेतकºयांनी नोंदणी केल्यानंतरही खाजगी बाजारपेठेत शेतमाल विक्री केला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, परभणी, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मूग व उडीद या शेतमालासाठी राज्य शासनाने २३ डिसेंबर रोजीची मुदत दिली होती. तर सोयाबीनच्या खरेदीसाठी ५ जानेवारीची अंतिम मुदत आहे. २३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये १९७७ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये ३ हजार ६६६ मूग, १६७ क्विंटल उडीद व ४९० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. खरेदी केंद्र उशिराने सुरु झाल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतमाल खरेदीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांना शेतमाल भावतारण योजनेंतर्गत फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.सोयाबीन खरेदीसाठी सेलू केंद्राला मुहूर्त सापडेनासोयाबीन खरेदीसाठी राज्य शासनाने ५ जानेवारीची मुदत दिली आहे. ही मुदत संपण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आतापर्यंत परभणी केंद्रावर ६ शेतकºयांकडून ६३ क्विंटल ५० किलो, जिंतूर येथील २६ शेतकºयांकडून २६० क्विंटल ५० किलो, पालम ११ शेतकºयांकडून ११७ क्विंटल, पाथरी येथील केंद्रावर २ शेतकºयांकडून १२ क्विंटल ५० किलो, पूर्णा येथील केंद्रावर ६ शेतकºयांकडून ३८ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्राकडून आतापर्यंत एकाही शेतकºयाकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकºयांना खाजगी बाजारपेठेत कवडीमोल दराने शेतमालाची विक्री करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.अशी झाली खरेदीनाफेडकडून जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्राकडून २३ डिसेंबरपर्यंत मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये परभणी येथील केंद्रावर २७२ शेतकºयांचे ५९८ क्विंटल, जिंतूर केंद्रावर ६ शेतकºयांचे ७ क्विंटल ३० किलो, सेलू येथील ८६३ शेतकºयांचे १ हजार ७५२ क्विंटल, पालम येथील २३० शेतकºयांचे ४८३ क्विंटल, पाथरी येथील केंद्रावर २८६ शेतकºयांचे ६९४ क्विंटल ९७ किलो तर पूर्णा येथील हमीभाव खरेदी केंद्रावर १२१ शेतकºयांचे १३२ क्विंटल ६७ किलो अशी एकूण ३ हजार ६६७ क्विंटल ९४ किलो मुगाची खरेदी करण्यात आली आहे. त्याच बरोबर पूर्णा येथील केंद्रावर ९ शेतकºयांचे ८ क्विंटल ४३ किलो, पाथरी येथे १० शेतकºयांचे १९ क्विंटल २६ किलो, पालम येथे ३ शेतकºयांकडून ४ क्विंटल ५८ किलो, सेलू येथील २० शेतकºयांकडून ३८ क्विंटल ४८ किलो, जिंतूर येथे सर्वाधिक ६५ शेतकºयांकडून ९४ क्विंटल ४७ किलो तर परभणी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ एका शेतकºयाकडून २ क्विंटल ७५ किलो उडदाची खरेदी करण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती