शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

परभणी : प्राथमिक पदवीधर शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:09 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधरचे जवळपास २५० शिक्षक जिल्ह्यात अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे समूपदेशन करुन त्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शिक्षक व त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. सभागृहातील जागा यासाठी कमी पडल्याने एकच गोंधळ झाला. त्यानंतर या प्रक्रियेवरच अनेक शिक्षकांनी आक्षेप नोंदविला. १७ जूनपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळीच समानीकरण व त्यानंतर बदल्या अशी प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे जवळपास २५० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांची अन्यत्र पदस्थापना करणे सुरु करण्यात आले. यासाठी गणित व विज्ञान प्रथम क्रमांक त्यानंतर भाषा विषय द्वितीय क्रमांक व सामाजिक शास्त्र तृतीय क्रमांक असा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. या प्रक्रियेला शिक्षकांचा विरोध नव्हता; परंतु, अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या यादीत सलग तीन वर्षापासून बदली झालेल्या शिक्षकांचीही नावे आली. यामध्ये गेल्या महिन्यातच बदली झालेल्या काही शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे वारंवार बदलीमुळे कंटाळलेल्या शिक्षकांनी आक्षेप नोंदवित संताप व्यक्त केला. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे समजून जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया स्थगित करुन तालुकास्तरावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना पुन्हा ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत समायोजनासाठी बोलविण्यात आले आहे. सातत्याने होणाºया या बदली प्रक्रियेमुळे शिक्षक अस्वस्थ झाले असून त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे.शासन निर्णयाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचा कानाडोळा४राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात एकदा बदली झालेल्या शिक्षकांची तीन वर्षात पुन्हा बदली करु नये, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे; परंतु, जिल्हा परिषद प्रशासन मात्र या निर्णयाकडे कानाडोळा करुन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली.४विशेष म्हणजे जून महिन्यामधील बदल्यांमध्ये एका शाळेवर भाषा विषयांचे दोन-दोन शिक्षक बदलीने नियुक्त करण्यात आले. आता तेथील एक शिक्षक अतिरिक्त ठरल्याच्या कारणावरुन त्याची बदली अन्यत्र केली जात आहे, अशीही शिक्षकांची तक्रार आहे.२८ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन४प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गुरुवारी बारगळली असली तरी दुपारनंतर माध्यमिकच्या २८ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया घेण्यात आली. यासाठी वेळ लागल्याने ती पुर्ण होऊ शकली नाही. शुक्रवारी उर्वरित प्रक्रिया होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदSchoolशाळाTeacherशिक्षक