शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

परभणी : प्राथमिक पदवीधर शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:09 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधरचे जवळपास २५० शिक्षक जिल्ह्यात अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे समूपदेशन करुन त्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शिक्षक व त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. सभागृहातील जागा यासाठी कमी पडल्याने एकच गोंधळ झाला. त्यानंतर या प्रक्रियेवरच अनेक शिक्षकांनी आक्षेप नोंदविला. १७ जूनपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळीच समानीकरण व त्यानंतर बदल्या अशी प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे जवळपास २५० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांची अन्यत्र पदस्थापना करणे सुरु करण्यात आले. यासाठी गणित व विज्ञान प्रथम क्रमांक त्यानंतर भाषा विषय द्वितीय क्रमांक व सामाजिक शास्त्र तृतीय क्रमांक असा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. या प्रक्रियेला शिक्षकांचा विरोध नव्हता; परंतु, अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या यादीत सलग तीन वर्षापासून बदली झालेल्या शिक्षकांचीही नावे आली. यामध्ये गेल्या महिन्यातच बदली झालेल्या काही शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे वारंवार बदलीमुळे कंटाळलेल्या शिक्षकांनी आक्षेप नोंदवित संताप व्यक्त केला. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे समजून जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया स्थगित करुन तालुकास्तरावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना पुन्हा ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत समायोजनासाठी बोलविण्यात आले आहे. सातत्याने होणाºया या बदली प्रक्रियेमुळे शिक्षक अस्वस्थ झाले असून त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे.शासन निर्णयाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचा कानाडोळा४राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात एकदा बदली झालेल्या शिक्षकांची तीन वर्षात पुन्हा बदली करु नये, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे; परंतु, जिल्हा परिषद प्रशासन मात्र या निर्णयाकडे कानाडोळा करुन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली.४विशेष म्हणजे जून महिन्यामधील बदल्यांमध्ये एका शाळेवर भाषा विषयांचे दोन-दोन शिक्षक बदलीने नियुक्त करण्यात आले. आता तेथील एक शिक्षक अतिरिक्त ठरल्याच्या कारणावरुन त्याची बदली अन्यत्र केली जात आहे, अशीही शिक्षकांची तक्रार आहे.२८ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन४प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गुरुवारी बारगळली असली तरी दुपारनंतर माध्यमिकच्या २८ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया घेण्यात आली. यासाठी वेळ लागल्याने ती पुर्ण होऊ शकली नाही. शुक्रवारी उर्वरित प्रक्रिया होणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीzpजिल्हा परिषदSchoolशाळाTeacherशिक्षक