शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

परभणी : पोलिसांनी जुळविले विस्कटलेले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:33 IST

दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे.पती-पत्नींमध्ये झालेल्या वादातून अथवा अन्य कारणांवरुन वाद निर्माण होऊन सासरच्या मंडळीविरुद्ध महिलांच्या तक्रारी दाखल होतात. यातून अनेक वर्षापासून सुरु असलेला सुखी संसार मोडतो. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज अशा प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. या प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करणे हा पर्याय नसून त्यात सामोचारानेही मार्ग काढता येऊ शकतो, या भावनेने पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना प्रारंभी महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविले जाते. या केंद्रातील अधिकारी व कर्मचारी महिलेच्या तक्रारीतील तथ्य जाणून घेतात. त्यानंतर या प्रकरणात तडजोड करण्याचे प्रयत्न केले जातात. दोन्ही पक्षकारांना समोर बसवून त्यांच्यात समेट घडवून आणला जातो. यातून अनेक वेळा तक्रारकर्त्यांच्या शंकांचे निरसण होऊन संसार पुन्हा सुरळीत होतो.१ जानेवारी ते १४ जुलैपर्यंत महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी ७० प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. या ७० ही प्रकरणातील पती-पत्नी आता गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे ७ महिन्यांच्या काळात विस्कटलेले ७० संसार पुन्हा जुळविण्याची कामगिरी या केंद्राने केली आहे.महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस उपनिरीक्षक गोपी सोनेत, पोलीस नाईक उमा पाटील, शकुंतला एकाडे, अर्चना रेड्डी, सीमा चाटे, आम्रपाली मुजमुले या कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.पीडित महिलांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. गुन्हा दाखल करण्यापेक्षा सामोपचारातून प्रकरण मिटवून घ्यावे, असे आवाहन महिला तक्रार निवारण केंद्राने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFamilyपरिवारPoliceपोलिस