शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

परभणी : पीकविमा प्रकरणी न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:10 AM

२०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : २०१७ च्या खरीप हंगामातील पीक विमा भरपाई देण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न केल्याने केंद्र, राज्य शासन, रिलायन्स कंपनी आणि भारतीय विमा प्राधिकरणाविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे़जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते़ मात्र विमा कंपनीच्या धोरणांमुळे शेतकºयांना विमा भरपाई मिळाली नाही़ ७ लाख ६११ शेतकºयांनी ३१ कोटी ५९ लाख रुपये विमा हप्ता भरला होता़ त्यामुळे ४ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी १४१८़०७ कोटी रुपये विमा संरक्षण देणे अपेक्षित होते़ मात्र विमा कंपनीने केवळ १४८ कोटी रुपये विमा भरपाई वाटप केली़ लिमला, बाभळगाव, आवलगाव आदी महसूल मंडळात उत्पन्नात घट झाली असतानाही शेतकºयांना विम्यापासून वंचित ठेवण्यत आले होते़ या सर्व प्रश्नांवर आंदोलनेही करण्यात आली़ त्यावेळी शासनाने विमा भरपाई देण्याचे आश्वासन दिले़ परंतु, त्याची पूर्तता मात्र केली नाही़या प्रश्नी शेतकरी संघर्ष समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली असून, या याचिकेत केंद्र व राज्य सरकारसह रिलायन्स पीक विमा कंपनी, भारतीय विमा प्राधिकरणाला प्रतिवादी करण्यात आले आहे़ त्यामुळे शेतकºयांना आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे़पीक विमा प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले आहे़ या याचिकेतून वंचित शेतकºयांना पीकविमा देण्याबरोबरच राज्य शासनाच्या विमा भरपाई देण्याच्या धोरणात बदल करण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित शेतकरी आता न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत, असे कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, रामकिशनराव दुधाटे यांनी सांगितले़ या प्रक्रियेसाठी एम़ आऱ काळे, सदाशिवआप्पा ढेले, जयसिंगआप्पा शिंदे, सचिन दुधाटे, विठ्ठल दुधाटे, आबासाहेब पवार, आबाराव दुधाटे, वसंत जोगदंड, सुरेश दुधाटे आदींनी प्रयत्न केले़

टॅग्स :parabhaniपरभणीCourtन्यायालयFarmerशेतकरी