शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

परभणी : १५ गावांतून दाखल झाले अधिग्रहणाचे २४ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:55 PM

यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : यंदाही अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यापासूून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करणारे जलस्रोत आटत चालल्याने तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांतील विहीर व बोअर अधिग्रहण करण्यासाठी २२ प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली नाही. परिणामी पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी कोरड्या पडत असल्याने ग्रामपंचायतीना अडचणी निर्माण होत आहेत. कसुरा व करपरा नदी काठावरील गावांना नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही गावातील जलकुंभ कोरडे पडल्याने ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागत आहे. तालुक्यातील लाडनांद्रा, गव्हा, ढेंगळी पिंपळगाव, पार्डी कौसडी, तांदुळवाडी, शिंदे टाकळी, चिकलठाणा बु., गुळखंड, खादगाव, कन्हेरवाडी, कान्हड, जवळा जिवाजी, कुंडी, वाकी, झोडगाव या १५ ग्रामपंचायतींनी गावातील पाणी उपलब्ध असलेले २२ जलस्रोत अधिग्रहण करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयात दाखल केले आहेत. यामधील १७ प्रस्ताव मंजूरीसाठी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. पं.स.कडून अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसील कार्यालयात आल्यानंतर मंडळ अधिकाºयांमार्फत पाहणी करून अहवाल सादर करून मंजूरी दिली जाते. ही प्रक्रिया संथगतीने होत असल्याने अनेक दिवस अधिग्रहणाचे प्रस्ताव संबंधित विभागात मंजुरीअभावी पडून आहेत.कसुरा, करपरा : नदीकाठ तहानलेलाच४ कसुरा, करपरा नदीवर मोठा बंधारा नाही. त्यामुळे पाणी अडविण्याचे साधन नाही. पावसाचे पाणी नदीपात्रातून सरळ वाहून जात आहे.४परिणामी दोन्ही नदी काठावरील गावांना पाणीपुरवठा करणाºया विहीरी कोरड्या पडत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई